शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 00:37 IST

रस्ता सुरक्षा सप्ताह या अभियानाकडे शासनाची योजना म्हणून न पाहता हा मानवी जीवन वाचविण्याचा उपक्रम आहे.

जिल्हाधिकारी चौधरी यांचे प्रतिपादन : २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभभंडारा : रस्ता सुरक्षा सप्ताह या अभियानाकडे शासनाची योजना म्हणून न पाहता हा मानवी जीवन वाचविण्याचा उपक्रम आहे. ज्या वयात नियमांचे पालन करणे आवश्यक असते त्याच वयात आजची मुलं वेगवान वाहन चालवितात.परिणामी विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी तसेच रस्ता सुरक्षेविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतुक नियंत्रण शाखा भंडारा यांच्या वतीने स्थानिक पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित २८ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधिक्षक जोगदंड, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, मुख्याधिकारी अनिल अढागळे व पोलीस निरिक्षक (वाहतूक शाखा) गोकुळ राऊत उपस्थित होते. ‘अपनी सुरक्षा, परिवार की रक्षा, सडक सुरक्षापर ध्यान दे हे ब्रिद असलेल्या २८ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे अप्पर पोलीस अधीक्षक नांदेडकर व पाहूण्यांनी दिप प्रल्वजन करुन उद्घाटन केले. यावेळी रस्ता सुरक्षेसंबंधी माहिती देणाऱ्या घडी पुस्तिकेचे जिल्हाधिकारी व अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी म्हणाल, देशात २०१५ मध्ये १ लक्ष ८० हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यु झाला. कुठल्याही आजाराने झालेल्या मृत्यू पेक्षा हा आकडा खुप मोठा आहे. वाहतूकीचे नियम व रस्ता सुरक्षा याबाबत दक्षता घेतली असती तर मृत्युची संख्या निश्चितच घटली असती. तरुण पिढी व विद्यार्थी वाहन चालवितांना खबरदारी घेतांना दिसत नाहीत. अशा सर्वांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयात रस्ता सूरक्षा जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. रस्ते अपघातामध्ये अनेक कुटूंबांनी आपला आधार गमाविला आहे. वडिलांनी तरुण मुलगा तर पत्नीनी आपला कर्ता पती गमाविला आहे. अशा वेळी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळत असून आपण सर्व मिळून वाहतूकीचे नियम पाळणे व रस्ता सुरक्षा याबाबत जागृत राहण्याचा संकल्प करु या!, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे म्हणाले, वाढत्या अपघाताला आपण कारणीभूत असून रस्ता ओलांडतांना तसेच वाहन चालवितांना वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघात निश्चितपणे टाळता येतील. अप्पर पोलीस अधीक्षक नांदेडकर म्हणाल्या, अपघातात जनहानी होणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ही वाढ रोखण्यासाठी सर्व समावेशक प्रयत्न आवश्यक आहेत. पोलीस विभाग आपल्या परीने कार्य करीत असले तरी नागरिकांनी वाहन चालवितांना स्वत: सोबतच इतरांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे यांनी केले तर आभार पोलीस निरिक्षक गोकूळ राऊत यांनी मानले. रस्ते सुरक्षा संबंधी सादरीकरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)