शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

गोहत्या बंदी कायदा शेतकऱ्यांसाठी मारक

By admin | Updated: July 13, 2017 00:30 IST

गोहत्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक होत असून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, ..

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचची न्यायाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोहत्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक होत असून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, संपूर्ण भारतामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू झाला. कायदा अत्यंत चांगला आहे. गुराढोरांची हत्या थांबायलाच पाहिजे हा आमचा उद्देश आहे. परंतु गोहत्याबंदी कायद्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या विकणाऱ्या जनावरांवर बंदी लादून शेतकऱ्यांचे अहित करणे हे योग्य नाही. शेतकरी शेतातला चारा इतरस्त्र जाण्यापेक्षा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जनावरे पालतो. ती जनावरे मुलांचे शिक्षण स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी विक्री करतो. यातून मिळणाऱ्या पैशातून आपला प्रपंच चालवितो. शेतकरी गुरेढोरे पाळतो. त्यामुळे शेतीसाठी शेणखत मिळतो. शेतीला रासायनिक खत कमी द्यावा लागतो. त्यात शेतकऱ्यांचे दोन पैसे जास्त वाचतात. त्या जनावरांमुळे दूध काढतो. तो एक व्यवसाय शेतीला पुरक असतो. मात्र या सर्व व्यवसायाला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांचा रोजगार हिसकावून घेण्यासाठी गोहत्या बंदी कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शेतकरी जनावरे बाजारात विकण्यासाठी नेतो तेव्हा त्यांचे गुरेढोरे जप्त मारण्याचा काम सुरु आहे. शेतकरी हा नेहमीच त्रस्त असून शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी गोबंदी कायद्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली जाते. त्यांची पिळवणूक केली जाते. याकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या गुराढोरांना विकण्यासाठी बाजारात आणण्याची मुभा द्यावी, शासन मुभा देत नसेल तर शेतकऱ्यांचे गुरे ढोरे शासनाने बाजारभावाप्रमाणे खरेदी करावे, शेतमाल खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्याचप्रमाणे गुरे ढोरे बाजार समित्या स्थापन करावे व चिंताग्रस्त शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचने केली आहे. शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष विष्णुदास लोणारे, सदस्य कन्हैया नागपुरे आदींचा समावेश होता.