शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

गोहत्या बंदी कायदा शेतकऱ्यांसाठी मारक

By admin | Updated: July 13, 2017 00:30 IST

गोहत्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक होत असून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, ..

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचची न्यायाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोहत्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक होत असून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, संपूर्ण भारतामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू झाला. कायदा अत्यंत चांगला आहे. गुराढोरांची हत्या थांबायलाच पाहिजे हा आमचा उद्देश आहे. परंतु गोहत्याबंदी कायद्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या विकणाऱ्या जनावरांवर बंदी लादून शेतकऱ्यांचे अहित करणे हे योग्य नाही. शेतकरी शेतातला चारा इतरस्त्र जाण्यापेक्षा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जनावरे पालतो. ती जनावरे मुलांचे शिक्षण स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी विक्री करतो. यातून मिळणाऱ्या पैशातून आपला प्रपंच चालवितो. शेतकरी गुरेढोरे पाळतो. त्यामुळे शेतीसाठी शेणखत मिळतो. शेतीला रासायनिक खत कमी द्यावा लागतो. त्यात शेतकऱ्यांचे दोन पैसे जास्त वाचतात. त्या जनावरांमुळे दूध काढतो. तो एक व्यवसाय शेतीला पुरक असतो. मात्र या सर्व व्यवसायाला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांचा रोजगार हिसकावून घेण्यासाठी गोहत्या बंदी कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शेतकरी जनावरे बाजारात विकण्यासाठी नेतो तेव्हा त्यांचे गुरेढोरे जप्त मारण्याचा काम सुरु आहे. शेतकरी हा नेहमीच त्रस्त असून शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी गोबंदी कायद्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली जाते. त्यांची पिळवणूक केली जाते. याकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या गुराढोरांना विकण्यासाठी बाजारात आणण्याची मुभा द्यावी, शासन मुभा देत नसेल तर शेतकऱ्यांचे गुरे ढोरे शासनाने बाजारभावाप्रमाणे खरेदी करावे, शेतमाल खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्याचप्रमाणे गुरे ढोरे बाजार समित्या स्थापन करावे व चिंताग्रस्त शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचने केली आहे. शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष विष्णुदास लोणारे, सदस्य कन्हैया नागपुरे आदींचा समावेश होता.