शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

कोविड लस ठरली पोलीस विभागासाठी ‘जीवन रक्षक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:27 IST

लस हीच जीवन रक्षक : लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू नाही भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने ...

लस हीच जीवन रक्षक : लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू नाही

भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली असून फ्रंटलाइन वर्कर म्हणून पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून दुसऱ्या तीव्र अशा लाटेतही केवळ लसीकरणामुळे पोलीस विभागात एकही मृत्यू झाला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायम आघाडीवर असणाऱ्या पोलीस विभागाला लसीच्या रूपाने जीवन रक्षा कवच प्राप्त झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत पोलीस विभागातील १४५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला तर १२७७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पहिला डोस घेतलेल्यांपैकी ५३(३.५७ टक्के) तर दुसरा डोस घेणाऱ्यापैकी ६७ (५.२४ टक्के) कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आलेत. मात्र, एकही मृत्यू झाला नाही. लसीकरण केल्यामुळेच पॉझिटिव्ह येऊनही कुणालाही आपला जीव गमवावा लागला नाही. लस ही जीवन रक्षक सिद्ध झाली आहे. ज्या पात्र पोलीस कर्मचारी कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी तात्काळ लस घ्यावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी केले.

ही बाब लक्षात घेता नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, लसीचे सुरक्षा कवच ज्यांच्याकडे आहे, त्यांना अजिबात धोका होणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. लस ही अत्यंत सुरक्षित असून लसीकरणाने आपले जीवन सुरक्षित होणार आहे. जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी केले आहे.

लसीकरण करून घ्या- आ. नाना पटोले

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर लस हेच प्रभावी शस्त्र असून पात्र प्रत्येक लाभार्थींनी आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आमदार नाना पटोले यांनी केले. राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्यापक जनहिताचा निर्णय असून भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घ्यावी, असे ते म्हणाले. कोरोनाविरुद्धचा लढा आपल्याला जिंकायचाच असून त्यासाठी ‘लस घ्या, सुरक्षित राहा,’ असा नारा त्यांनी दिला.