शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

संगनमताने जमीन हडपली

By admin | Updated: July 31, 2015 01:07 IST

पवनी तालुक्यातील सोमनाळा (बुज.) येथील शेतकरी बळीराम चिंगा रामटेके यांच्या जमिनीवरचा अवैध फेरफार करून तत्कालीन तलाठी, कोंढा यांनी रामटेके यांच्या मालकीच्या शेतीपैकी काही शेती दुसऱ्याच्या नावे केली.

पत्रपरिषद : न्यायासाठी शेतकरी फिरतोय दारोदारपवनी : पवनी तालुक्यातील सोमनाळा (बुज.) येथील शेतकरी बळीराम चिंगा रामटेके यांच्या जमिनीवरचा अवैध फेरफार करून तत्कालीन तलाठी, कोंढा यांनी रामटेके यांच्या मालकीच्या शेतीपैकी काही शेती दुसऱ्याच्या नावे केली. सदर शेतकरी दोन वर्षापासून अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या दारोदारी फिरत आहे. पण कोणीही त्याची दखल घेत नसल्याची आपबिती बळीराम रामटेके यांनी पवनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत कथन केली.पत्रकार परिषदेत आपली, आपबिती बळीराम रामटेके यांनी कथन करताना सांगितले की, त्यांची वडिलोपार्जीत शेती मौजा सोमनाळा येथे ख.नं. २५४ त.सा. क्रं. १४ गट नं. ७२/१ आराजी ०.७१ हे.आर. या शेतीचा जुना गट नं. ७२ आराजी १.१५ हे.आर. होता. या शेतीपैकी गोसीखुर्द धरणाच्या कालव्यात ०.४९ हे.आर. जमीन गेली. सदर शेती १९९८ ते २००९ पर्यंत बळीराम रामटेके यांच्याच नावे होती व त्या शेतीवर त्यांचाच कब्जा होता. सदर जमीन सन २००९ मध्ये कोणालाही विकलेली नसताना त्या जमिनीवर २००९ मध्ये हिरकन्या रामटेके यांचे नाव त्या जमिनीच्या गटावर कसे आले हे एक कोडे असून नंतर त्यांना त्या जमिनीचे विक्रीपत्र करून दिले व आता त्या जमिनीवर २००९-१० मध्ये त्या जमिनीवर मुनेश्वर गोस्वामी यांचे नाव आले आहे.तत्कालीन तलाठी कोंढा यांनी वरील व्यक्तीच्या संगनमताने बळीराम रामटेके यांनी जमीन विकलेली नसतानाही केवळ जुन्या गट क्रमांकाच्या ५३२, आराजी ०.९२ हे.आर. शेती पैकी गोसीखुर्द धरणात गेलेली ०.२१ हे.आर. या शेतीच्या आदेशाचा पुरावा सादर करून फेरफार क्रमांक ६१२ दि.१७ आॅगस्ट २००९ ला दिवाणी न्यायालय पवनी केस नं. ७६/९९ सत्र न्यायालय अपील क्रमांक १२०/२००५ नुसार प्रत्यक्षात धरणात गेलेली बळीराम रामटेके यांची ०.४४ हे.आर. १७ आॅगस्ट २००९ ला हिरकन्या जीवन रामटेके यांचे नावे केली.त्यानंतर तीन महिन्यातच हिरकन्या हिने तिचा भाचा मुनेश्वर गोस्वामी यांचे नावाने विक्री करून दिले व २००९ लाच मुनेश्वरने बळीरामकडून बळजबरीने जमिनीचा ताबा घेतला व शेती हडप केली. यासंबंधाने बळीराम यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेवून राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर यांचे अपील क्रमांक १०७९/२०१२ वर ६ नोव्हेंबर २०१२ जा.कं्र. ६१९४ दि. १९ डिसेंबर २०१२ नुसार आदेश झाला असतानाही तहसिलदार पवनी व उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी अजुनपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे अपील दाखल करूनही अजुनपर्यंत कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे मानसीकता बिघडून न्यायासाठी दारोदार भटकत आहेत. पण अजुनपर्यंत न्याय न मिळाल्याची खंत पत्रकार परिषदेत बळीराम रामटेके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)