शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संगनमताने जमीन हडपली

By admin | Updated: July 31, 2015 01:07 IST

पवनी तालुक्यातील सोमनाळा (बुज.) येथील शेतकरी बळीराम चिंगा रामटेके यांच्या जमिनीवरचा अवैध फेरफार करून तत्कालीन तलाठी, कोंढा यांनी रामटेके यांच्या मालकीच्या शेतीपैकी काही शेती दुसऱ्याच्या नावे केली.

पत्रपरिषद : न्यायासाठी शेतकरी फिरतोय दारोदारपवनी : पवनी तालुक्यातील सोमनाळा (बुज.) येथील शेतकरी बळीराम चिंगा रामटेके यांच्या जमिनीवरचा अवैध फेरफार करून तत्कालीन तलाठी, कोंढा यांनी रामटेके यांच्या मालकीच्या शेतीपैकी काही शेती दुसऱ्याच्या नावे केली. सदर शेतकरी दोन वर्षापासून अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या दारोदारी फिरत आहे. पण कोणीही त्याची दखल घेत नसल्याची आपबिती बळीराम रामटेके यांनी पवनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत कथन केली.पत्रकार परिषदेत आपली, आपबिती बळीराम रामटेके यांनी कथन करताना सांगितले की, त्यांची वडिलोपार्जीत शेती मौजा सोमनाळा येथे ख.नं. २५४ त.सा. क्रं. १४ गट नं. ७२/१ आराजी ०.७१ हे.आर. या शेतीचा जुना गट नं. ७२ आराजी १.१५ हे.आर. होता. या शेतीपैकी गोसीखुर्द धरणाच्या कालव्यात ०.४९ हे.आर. जमीन गेली. सदर शेती १९९८ ते २००९ पर्यंत बळीराम रामटेके यांच्याच नावे होती व त्या शेतीवर त्यांचाच कब्जा होता. सदर जमीन सन २००९ मध्ये कोणालाही विकलेली नसताना त्या जमिनीवर २००९ मध्ये हिरकन्या रामटेके यांचे नाव त्या जमिनीच्या गटावर कसे आले हे एक कोडे असून नंतर त्यांना त्या जमिनीचे विक्रीपत्र करून दिले व आता त्या जमिनीवर २००९-१० मध्ये त्या जमिनीवर मुनेश्वर गोस्वामी यांचे नाव आले आहे.तत्कालीन तलाठी कोंढा यांनी वरील व्यक्तीच्या संगनमताने बळीराम रामटेके यांनी जमीन विकलेली नसतानाही केवळ जुन्या गट क्रमांकाच्या ५३२, आराजी ०.९२ हे.आर. शेती पैकी गोसीखुर्द धरणात गेलेली ०.२१ हे.आर. या शेतीच्या आदेशाचा पुरावा सादर करून फेरफार क्रमांक ६१२ दि.१७ आॅगस्ट २००९ ला दिवाणी न्यायालय पवनी केस नं. ७६/९९ सत्र न्यायालय अपील क्रमांक १२०/२००५ नुसार प्रत्यक्षात धरणात गेलेली बळीराम रामटेके यांची ०.४४ हे.आर. १७ आॅगस्ट २००९ ला हिरकन्या जीवन रामटेके यांचे नावे केली.त्यानंतर तीन महिन्यातच हिरकन्या हिने तिचा भाचा मुनेश्वर गोस्वामी यांचे नावाने विक्री करून दिले व २००९ लाच मुनेश्वरने बळीरामकडून बळजबरीने जमिनीचा ताबा घेतला व शेती हडप केली. यासंबंधाने बळीराम यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेवून राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर यांचे अपील क्रमांक १०७९/२०१२ वर ६ नोव्हेंबर २०१२ जा.कं्र. ६१९४ दि. १९ डिसेंबर २०१२ नुसार आदेश झाला असतानाही तहसिलदार पवनी व उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी अजुनपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे अपील दाखल करूनही अजुनपर्यंत कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे मानसीकता बिघडून न्यायासाठी दारोदार भटकत आहेत. पण अजुनपर्यंत न्याय न मिळाल्याची खंत पत्रकार परिषदेत बळीराम रामटेके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)