शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींच्या खर्चानंतरही रस्ता ठरला कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:31 IST

खमारी ते बेलगाव रस्ता यंत्रणांच्या साठगाठीचा बळी ठरला आहे. दोन वर्षांपासून २ कोटींचा निधी मंजूर असताना तो खर्च करून रस्त्याचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पावसाळ्या अगोदर सदर रस्त्याचे बीबीएम करण्यात आले. परंतू कारपेट न झाल्याने रस्ता उखडला तर चिखलामुळे वाहनांचे अपघात वाढले आहेत.

ठळक मुद्देखमारी ते बेलगाव रस्ता : बांधकाम विभागाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : खमारी ते बेलगाव रस्ता यंत्रणांच्या साठगाठीचा बळी ठरला आहे. दोन वर्षांपासून २ कोटींचा निधी मंजूर असताना तो खर्च करून रस्त्याचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पावसाळ्या अगोदर सदर रस्त्याचे बीबीएम करण्यात आले. परंतू कारपेट न झाल्याने रस्ता उखडला तर चिखलामुळे वाहनांचे अपघात वाढले आहेत.भिलेवाडा ते मांडवी रस्ता मृत्यूमार्ग म्हणून ओळखला जातो. खोल खड्ड्यांची संख्या तर बांधकाम विभागालाही मोजता येणार नाहीत. ऐवढी आहेत. रस्त्याच हाल बेहाल आहेत. याला रस्ता म्हणावा की चिखलाने माखलेला मृत्यू मार्ग हे आता बांधकाम विभागानेच सांगण्याची गरज आहे. मागील वर्षी या निधीतून खडकी ते ढिवरवाडा ५ कि़मी.चा मार्ग तयार करण्यात आला. मात्र, वर्षभरातच मार्ग अनेक ठिकाणी उखडला आहे. ओरड वाढल्याने यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावर उर्वरित निधीतून बेलगाव ते खमारी पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले. मात्र, कारपेट न करता बीबीएम करून कंत्राटदाराला मोकळे सोडण्यात आले. बीबीएम झालेल्या रस्त्यावर आज अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडांची पार ऐसीतैसी झाली आहे. परंतू विभागाने बांधकाम पूर्ण करून घेण्याचे धाडस दाखविले नाही. चिखलाने माखलेल्या रस्त्यावर वाहनचालकांना मरणास मोकळे सोडले आहे. यंत्रणांच्या साठगाठीचा परिणाम आज सर्वांना भोगावा लागतो आहे. प्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशी मागणी होत आहे.दोन वर्षापूर्वी मिळाला ३ कोटींचा निधीरस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागील ५ वर्षापासून ओरड असताना दोन वर्षांपुर्वी भिलेवाडा ते खडकी मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ३ कोटी रूपये मंजूर झाले. मात्र, रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून निधी दोन वर्षांतही बांधकाम विभागाला खर्च करता आला नाही. या मार्गावरील वाहतुकदारांचे दुदैव आहे.अनेकांना गमवावा लागला जीवया रस्त्यावर मागील वेळी मंडणगाव येथील दोन सख्या बहिणींना तर बेरोडी जवळ दुचाकीस्वाराला अपघातात जीव गमवावा लागला. गंभीर व किरकोळ जखमी झालेल्यांचे प्रमाण मोठे आहे. या रस्त्याच्या कडा फुटभर खोल आहेत. आडव्या नाल्या व कडेला पाणी साचून राहत असल्याने वाहने कडेला घेता येत नाही. चिखलात वाहन घसरून अपघात होत आहेत.