शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

धान रोवणीच्या खर्चात यंदा एकरी एक हजाराची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

मजुरांची टंचाई भंडारा जिल्ह्यात नवीन नाही. धान रोवणीसाठी मजुरांची गरज असते. यांत्रिक पद्धतीने रोवणी होत असली, तरी भंडारा जिल्ह्यात मात्र त्याला कुणाचीच पसंती दिसत नाही. त्यामुळे परंपरागत पद्धतीनेच धानाची रोवणी केली जाते. गतवर्षी रोवणीसाठी प्रतिएकरी २८०० ते ३२०० रुपये खर्च आला होता. परंतु, यावर्षी दर वाढले आहेत. यंदा एकरी ३८०० ते ४२०० रुपये खर्च येत आहे.

ठळक मुद्देडिझेल आणि मजूर दरवाढीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डिझेल आणि मजुरीच्या दरात झालेल्या वाढीचा फटका यंदा धान रोवणीला बसत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धान रोवणीचा खर्च एकरी एक हजार रुपयाने वाढल्याचे दिसत आहे. यानंतरही धानावर शेतकऱ्यांना खर्च करावाच लागणार आहे. निसर्गाने साथ दिली तर ठीक; अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी कर्जाचा डोंगर आहेच.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाच्या लागवडीसाठी मुबलक पावसाची गरज असते. भंडारा जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १३०२ मिमी असून गावागावांत तलाव आहेत. त्यामुळे धान लागवडीसाठी येथील वातावरण पोषक आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात कितीही घाटा आला तरी धानाची लागवड करतोच. परंतु अलीकडे यांत्रिकीकरण, मजुरांची टंचाई आणि इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गतवर्षी डिझेलचे दर ६५ रुपये लीटर होते. धान लागवडीसाठी चिखलणी केली जाते. या चिखलणीसाठी ट्रॅक्टरचा दर प्रतितास ६०० रुपये होता. परंतु, आता डिझेलचा दर ९७ रुपये प्रतिलीटर झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या चिखलणीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. प्रतितास एक हजार रुपये चिखलणीसाठी ट्रॅक्टरमालक घेत आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी ४०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. मजुरांची टंचाई भंडारा जिल्ह्यात नवीन नाही. धान रोवणीसाठी मजुरांची गरज असते. यांत्रिक पद्धतीने रोवणी होत असली, तरी भंडारा जिल्ह्यात मात्र त्याला कुणाचीच पसंती दिसत नाही. त्यामुळे परंपरागत पद्धतीनेच धानाची रोवणी केली जाते. गतवर्षी रोवणीसाठी प्रतिएकरी २८०० ते ३२०० रुपये खर्च आला होता. परंतु, यावर्षी दर वाढले आहेत. यंदा एकरी ३८०० ते ४२०० रुपये खर्च येत आहे. यानंतर निंदण, रासायनिक खतांच्या मात्रा, काढणी व पिकांची रखवाली यावर पैसा खर्च केला जातो. चार महिने धानपिकाला जिवापाड जपावे लागते. यानंतरही निसर्गाने योग्य साथ दिली तर ठीक अन्यथा पुन्हा दुष्काळाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी धान रोवणीला वेग आला आहे. मजूर एकरी गुत्ता घेतात आणि वेगाने रोवणी करून देतात. शेतकऱ्यालाही ते परवडणारे असते. परंतु, दरवाढीने यंदा शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विकलेल्या धानाचे बोनसही पूर्णपणे मिळाले नाही. रब्बी हंगामात विकलेल्या धानाचे चुकारेही अद्याप आले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी खर्च करताना सावकाराच्या दारात जावे लागत आहे.

रासायनिक खतांच्या किमतीने बिघडले गणित- पूर्वी धानपिकासाठी शेणखतासह परंपरागत खतांचा वापर केला जात होता. परंतु, अलीकडे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रासायनिक खतांशिवाय संकरीत धानपीक हातीच येत नसल्याची  भावना शेतकऱ्यांचीच आहे. त्यामुळे शेतकरी युरिया, डीएपी आणि मिश्रखतांचा वापर करतात. अलीकडे खताच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऐन हंगामात खतांची काळाबाजारी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा चढ्या दरात खत विकत घेण्याची वेळ येते. यासोबतच खताचे लिंकिंग करण्याचा फंडाही काही रासायनिक खतनिर्मिती कंपन्यांनी केला आहे. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती