शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

धान रोवणीच्या खर्चात यंदा एकरी एक हजाराची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

मजुरांची टंचाई भंडारा जिल्ह्यात नवीन नाही. धान रोवणीसाठी मजुरांची गरज असते. यांत्रिक पद्धतीने रोवणी होत असली, तरी भंडारा जिल्ह्यात मात्र त्याला कुणाचीच पसंती दिसत नाही. त्यामुळे परंपरागत पद्धतीनेच धानाची रोवणी केली जाते. गतवर्षी रोवणीसाठी प्रतिएकरी २८०० ते ३२०० रुपये खर्च आला होता. परंतु, यावर्षी दर वाढले आहेत. यंदा एकरी ३८०० ते ४२०० रुपये खर्च येत आहे.

ठळक मुद्देडिझेल आणि मजूर दरवाढीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डिझेल आणि मजुरीच्या दरात झालेल्या वाढीचा फटका यंदा धान रोवणीला बसत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धान रोवणीचा खर्च एकरी एक हजार रुपयाने वाढल्याचे दिसत आहे. यानंतरही धानावर शेतकऱ्यांना खर्च करावाच लागणार आहे. निसर्गाने साथ दिली तर ठीक; अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी कर्जाचा डोंगर आहेच.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाच्या लागवडीसाठी मुबलक पावसाची गरज असते. भंडारा जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १३०२ मिमी असून गावागावांत तलाव आहेत. त्यामुळे धान लागवडीसाठी येथील वातावरण पोषक आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात कितीही घाटा आला तरी धानाची लागवड करतोच. परंतु अलीकडे यांत्रिकीकरण, मजुरांची टंचाई आणि इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गतवर्षी डिझेलचे दर ६५ रुपये लीटर होते. धान लागवडीसाठी चिखलणी केली जाते. या चिखलणीसाठी ट्रॅक्टरचा दर प्रतितास ६०० रुपये होता. परंतु, आता डिझेलचा दर ९७ रुपये प्रतिलीटर झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या चिखलणीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. प्रतितास एक हजार रुपये चिखलणीसाठी ट्रॅक्टरमालक घेत आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी ४०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. मजुरांची टंचाई भंडारा जिल्ह्यात नवीन नाही. धान रोवणीसाठी मजुरांची गरज असते. यांत्रिक पद्धतीने रोवणी होत असली, तरी भंडारा जिल्ह्यात मात्र त्याला कुणाचीच पसंती दिसत नाही. त्यामुळे परंपरागत पद्धतीनेच धानाची रोवणी केली जाते. गतवर्षी रोवणीसाठी प्रतिएकरी २८०० ते ३२०० रुपये खर्च आला होता. परंतु, यावर्षी दर वाढले आहेत. यंदा एकरी ३८०० ते ४२०० रुपये खर्च येत आहे. यानंतर निंदण, रासायनिक खतांच्या मात्रा, काढणी व पिकांची रखवाली यावर पैसा खर्च केला जातो. चार महिने धानपिकाला जिवापाड जपावे लागते. यानंतरही निसर्गाने योग्य साथ दिली तर ठीक अन्यथा पुन्हा दुष्काळाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी धान रोवणीला वेग आला आहे. मजूर एकरी गुत्ता घेतात आणि वेगाने रोवणी करून देतात. शेतकऱ्यालाही ते परवडणारे असते. परंतु, दरवाढीने यंदा शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विकलेल्या धानाचे बोनसही पूर्णपणे मिळाले नाही. रब्बी हंगामात विकलेल्या धानाचे चुकारेही अद्याप आले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी खर्च करताना सावकाराच्या दारात जावे लागत आहे.

रासायनिक खतांच्या किमतीने बिघडले गणित- पूर्वी धानपिकासाठी शेणखतासह परंपरागत खतांचा वापर केला जात होता. परंतु, अलीकडे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रासायनिक खतांशिवाय संकरीत धानपीक हातीच येत नसल्याची  भावना शेतकऱ्यांचीच आहे. त्यामुळे शेतकरी युरिया, डीएपी आणि मिश्रखतांचा वापर करतात. अलीकडे खताच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऐन हंगामात खतांची काळाबाजारी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा चढ्या दरात खत विकत घेण्याची वेळ येते. यासोबतच खताचे लिंकिंग करण्याचा फंडाही काही रासायनिक खतनिर्मिती कंपन्यांनी केला आहे. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती