शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

हमीभावापेक्षा धान उत्पादनासाठी लागणारा खर्च जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST

केशोरी : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर हे चार जिल्हे भात उत्पादक जिल्हे म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. ...

केशोरी : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर हे चार जिल्हे भात उत्पादक जिल्हे म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. परंतु दररोज वाढणाऱ्या डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीमुळे यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडून शेतीत उत्पादन खर्च पदरी न पडता आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत असल्याने बळीराजाचा धीर खचू लागला आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या खाईत लोटला जात असल्याची खंत शेतीनिष्ठ शेतकरी विनोद पाटील गहाणे यांनी व्यक्त केली आहे.

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. विज्ञान युगात यांत्रिकी वस्तूच्या वापरामुळे देशाची प्रगती झाली, असे वाटत असले तरी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था शेतीच्या भरवशावर टिकून आहे.

कोरोनासारख्या महामारीत देशातील अनेक उद्योगधंद्यांना झळ पोहोचून ते बंद पडले. मात्र, या देशातील शेतकऱ्यांनी आपली शेती सोडली नाही. देशासाठी अन्न पिकविण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले. परिणामी देश अन्नधान्यापासून परिपूर्ण बनू शकला.

देशातील आर्थिक स्थिती सक्षम झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. परंतु, शासन शेतकऱ्यांची काळजी न करता वारंवार डिझेल-पेट्रोलची भाववाढ करून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे.

पेट्रोल-डिझेल ५० टक्के अनुदानावर द्या

वर्षभर शेतीची नांगरणी, वखरणी आणि चिखलणीसाठी लागणारा खर्च मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रतिएकर १००० ते १२०० रुपयांनी वाढला आहे. खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने रोवणीचा खर्च हजारांच्या पटीत वाढला आहे. मात्र, शासनाने धानाचे हमीभाव जाहीर करताना फक्त ७२ रुपयेच वाढविले आहे. शेती खर्चाच्या तुलनेत हमीभावाची वाढ अत्यंत अल्पशा प्रमाणात असल्याने भात शेती करणे परवडणारे नाही. अशात केंद्र शासनाने डिझेल-पेट्रोलच्या किमतीत वाढ न करता शेतकऱ्यांसाठी प्रतिएकर १० लिटर डिझेल-पेट्रोल ५० टक्के अनुदानावर देऊन शेतकऱ्यांना आधार देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतीनिष्ठ शेतकरी गहाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.