शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

उत्पन्नापेक्षा कापणी-मळणीचा खर्च अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणत: एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्र ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतुड्याने आक्रमन केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात आली नाही. आता सर्वत्र कापणीचा आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. मात्र उत्पन्नापेक्षा कापणी आणि मळणीचाच खर्च अधिक होत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : चार एकरात पाच ते सहा पोते धान, तुडतुड्याचा प्रकोप, उसणवारी अन् बँकांचे कर्ज फेडायचे कसे

ज्ञानेश्वर मुंदे Ü लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाचा अवकृपेचा सामना करणाऱ्या धान उत्पादकांना यंदा तुडतुड्याने उध्वस्त केले आहे. संपूर्ण शेतशिवार तुडतुड्याने फस्त केले असून आता उत्पन्नापेक्षा कापणी मळणीचाच खर्च अधिक होत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी चक्क उभा धान पेटवून दिला तर काही मोठ्या हिंमतीने धानाची मळणी करताना दिसत आहे. मोहाडी तालुक्यातील काही गावात तर चार एकरात पाच ते सहा पोते धान होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी देशोधडीला लागत आहे.भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणत: एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्र ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतुड्याने आक्रमन केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात आली नाही. आता सर्वत्र कापणीचा आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. मात्र उत्पन्नापेक्षा कापणी आणि मळणीचाच खर्च अधिक होत असल्याचे दिसत आहे. मशागत, बियाणे, रोवणी, फवारणी, कापणी, बांधणी, मळणी यावर साधारणत: २२ हजार रूपये खर्च होतो. २५ ते ३० पोती धान अपेक्षित असतो. मात्र यावर्षी खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळताना दिसत नाही. सध्या कापणीसाठी एकरी दोन ते तीन हजार रुपये, बांधणीसाठी १५०० रुपये आणि मळणीसाठी ९० रुपये एकरी खर्च होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात एकरी पाच ते दहा बोरे पोतेच येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.मोहाडी तालुक्याला सर्वाधिक तुडतुड्याचा फटका बसला. कापणी आणि मळणीचाही खर्च निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी आता चक्क उभा धान पेटवून दिला आहे. मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथील शेतकरी ईश्वर माटे यांनी चक्क आपल्या अडीच एकर शेतातील धानाला आग लावून दिली. अशीच अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे. मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथील शेतकरी बाळकृष्ण पगारवार, देविदास मते, दुर्गाप्रसाद मते, मनोहर निंबार्ते, किशोर सपाटे म्हणाले, तुडतुड्याने आम्हाला उध्वस्त केले आहे. धानातून काही हाती येत नाही. संपूर्ण वर्ष कसे काढावे, असा प्रश्न आहे. आधिच कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावली अशा स्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न आहे. शासनाने तात्काळ तुटतुड्यामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्या तरी कोणत्याच हालचाली दिसत नाही.

चार एकरात पाच पोतेही धान नाहीमोहाडी तालुक्यातील शिवनी येथील शेतकरी युगल सराटे यांचे शेत तुडतुड्याने उध्वस्त केले. आता त्यांच्या शेतात मळणी सुरू आहे. चार एकरात पाच ते सहा पोते धान होण्याचीही शाश्वती नाही, असे युगल सराटे यांनी सांगितले. शेतात केवळ तणस असून धानाची मळणी करावी की नाही, असा प्रश्न माझ्यासोबत अनेक शेतकऱ्यांना पडला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर मेहनत करून हाती काहीच उरत नसेल तर जगायचे कसे, असा सवाल आंधळगावचे भोजराम शेंडे यांनी केला.धान उध्वस्त, सांगा जगायचे कसेपिकासाठी शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत घ्यायची, रात्रीचा दिवस करायचा, घाम गाळायचा आणि त्याचे उत्पन्न शेतकऱ्यांना शून्य मिळत असेल तर जगायचे कसे, असा बिकट प्रश्न धान उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी धान पिकाकडे मोठ्या आशेने पाहतात. परंतु निसर्गाची वक्रदृष्टी आणि कीडींच्या आक्रमानाने धान पीक उध्वस्त झाले. धान मळणही करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. एकीकडे आधारभूत धान खरेदी सुरू झाली. परंतु धान अल्प प्रमाणात येत आहे. अनेक शेतकरी आता हा धान रोखीने व्यापाऱ्यांना विकूण दिवाळी सण साजरा करण्याच्या मनस्थितीत दिसत आहे.

निसर्गार्चा प्रकोप कुणी रोखू शकत नाही. यंदा धान पिकाला महापुराचा फटका बसला. यातून शेतकरी सावरत नाही. तोच धानावर तुडतुड्याचे आक्रमण झाले. अनेक शेतकरी हतबल दिसत आहे. मात्र नैसर्गीक संकटाला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीचा हिम्मतीने सामना करावा. तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आपण अधिवेशनात मांडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.-राजू कारेमोरे, आमदार.

टॅग्स :agricultureशेती