शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरतोय, पण धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 09:05 IST

Bhandara news कोरोना रुग्णांचा आलेख घसरायला लागताच नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. सकाळी अत्यावश्यक खरेदीच्या निमित्ताने आणि दिवसभर विविध कारणांचा शोध घेत शहरभर भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची बेफिकिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाण झाले कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने भयभीत झालेल्या जनतेला मे महिन्यात मोठा दिलासा मिळाला. रुग्णसंख्येसह मृत्यूंचे प्रमाणही कमी होऊ लागले. कोरोना रुग्णांचा आलेख घसरायला लागताच नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. सकाळी अत्यावश्यक खरेदीच्या निमित्ताने आणि दिवसभर विविध कारणांचा शोध घेत शहरभर भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी संसर्गाचा धोका मात्र कायम आहे. भंडारा जिल्ह्याला एप्रिल महिना भयभीत करून गेला. दररोज सरासरी १,२०० कोरोना रुग्ण आढळून येत होते तर २० ते २५ जणांचा मृत्यू होत होता. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वचजण चिंताग्रस्त झाले होते. शासनाने संचारबंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले. शहरी आणि ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येने नागरिक नियमांचे पालन करून लागले होते. परंतु, मे महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्याला दिलासा मिळाला. कोरोना रुग्णांची संख्या ५००च्या आत येऊ लागली. तसेच मृत्यूही एक आकडी संख्येत नोंदविले जाऊ लागले.

गत आठ दिवसातील कोरोना रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास रुग्णसंख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशास्थितीत नागरिकांची बेफिकिरी पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने बाहेर पडणाऱ्यांची संख्याही गत तीन-चार दिवसात वाढली आहे. भाजीपाला खरेदीच्या नावाखाली भाजी बाजारात मोठी गर्दी होत आहे. बिनकामाचे अनेक तरूण रत्यावरून फिरताना दिसत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी शहरातील नागरिकांना शिस्त लावली. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी प्रसाद दिला. त्यामुळेही गत आठवड्यात रस्त्यावर गर्दी कमी झाली होती. परंतु, आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिक पुन्हा बेफिकीर झाले आहेत.

रुग्णसंख्या कमी होत असली, तरी संसर्गाचा धोका कायमच आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझर आवश्यक झाले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही गरजेचे आहे. बाजारातून खरेदी करताना कोणती वस्तू कोणाकडून खरेदी करतो, याची चाचपणी करूनच खरेदी करणे गरजेचे आहे. अन्यथा खरेदीच्या आड कोरोना संसर्ग होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस