शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आठवडाभरात कोरोनाचा केवळ एकच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा एप्रिल महिन्यात हाहाकार उडाला होता. मृत्यूचेही तांडव सुरू होते. दररोज १२००च्या वर रुग्ण आणि सरासरी ...

भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा एप्रिल महिन्यात हाहाकार उडाला होता. मृत्यूचेही तांडव सुरू होते. दररोज १२००च्या वर रुग्ण आणि सरासरी १५ ते २० जणांचा मृत्यू होत होता. सर्वत्र भयभीत वातावरण झाले होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या कमी व्हायला लागली. त्यासोबतच मृत्यूचे प्रमाणही कमी होऊ लागले. जिल्ह्यात आतापर्यंत १०५५ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एप्रिलपासून आतापर्यंत ७१२ जणांचा कोरोनाने बळी गेला. पहिल्या लाटेत केवळ ३४३ जणांचाच मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेने मृत्यूचे तांडव अनुभवत असताना आता मृत्यूसंख्या नियंत्रणात आली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ४ जून रोजी मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत्यूची संख्या कमी होत असल्याने आरोग्य प्रशासनासह जिल्हा यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात तर अंत्यसंस्कारासाठीही प्रतीक्षा करावी लागत होती. गराडा येथील स्मशानभूमीत दररोज २० ते २५ मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्यात येत होते. आता मृत्यूसंख्या नियंत्रणात आल्याने संबंधितांना दिलासा मिळाला आहे.

मृत्यूसंख्येसोबतच रुग्णसंख्याही कमी होताना दिसत आहे. १ जूनपासून सरासरी १००च्या आत रुग्ण येत आहेत. सोमवारी तर केवळ १४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या. १ जून रोजी ९०, २ जून रोजी १०, ३ जून रोजी १०१, ४ जून रोजी ८५, ५ जून रोजी ३३, ६ जून रोजी ३४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. सध्या जिल्ह्याच्या एका दिवसाची जेवढी आकडेवारी येत आहे ती एप्रिल महिन्यात केवळ एकट्या गावाची असायची. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार २१२ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यात पहिल्या लाटेत १७ हजार ६४५ व्यक्तींचा समावेश होता, तर दुसऱ्या लाटेत ४१ हजार ५४७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले होते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची वेगाने संख्या वाढल्याने रुग्णालयात जागा मिळणे कठीण झाले होते. ऑक्सिजन बेडसाठीही भटकंती करावी लागत होती.

बाॅक्स

अंशत: अनलाॅक, मात्र धोका कायम

जिल्ह्यात अनलाॅक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भंडारा अनलाॅक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात असून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. मात्र अनलाॅक प्रक्रिया सुरू होताच बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीवर प्रशासन नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असले तरी नागरिक मात्र कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. नागरिक बेजबाबदारपणे वागले तर कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्यापेक्षाही भयंकर राहण्याची भीती आहे.

बाॅक्स

सोमवारी चार तालुके निरंक

सोमवारी १२५६ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात केवळ १४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ८, पवनी ५ आणि मोहाडी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तुमसर, लाखनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यात सोमवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. तर १०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ७३४ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोट

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी निश्चिंत राहता येणार नाही. गत आठवड्यात कोरोनाचा एकच मृत्यू झाला आहे. पाॅझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. नागरिकांनी कोविड प्रोटोकाॅलचे पालन केल्यास हा दर आणखी कमी होण्यास मदत होणार आहे. कोरोना पाॅझिटिव्ह शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

- संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा