शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

भंडारा : वाढत्या आधुनिकीकरणासोबतच मानवीय जीवनशैलीत अमूलाग्र बदल घडून आला आहे. त्यातच कोरोना महामारीने भर घातली. याशिवाय मोबाईलच्या ...

भंडारा : वाढत्या आधुनिकीकरणासोबतच मानवीय जीवनशैलीत अमूलाग्र बदल घडून आला आहे. त्यातच कोरोना महामारीने भर घातली. याशिवाय मोबाईलच्या अती वापराने मानवीय मनावर चांगलाच परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे झोपेची समस्या उद्‌भवत आहे. याबाबत वेळीच काळजी घेऊन दैनंदिन कामकाजाबाबत आखणी करणे गरजेचे बनले आहे.

गत दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच त्रस्त बनले आहेत. यातच सोशल मीडियाचा वापर जास्त झाल्याने मोबाईलचा वापरही वाढला आहे. रात्री-बेरात्री मोबाईल पाहण्याचा व वापरण्याचा परिणाम मानवीय शरीरावर बघायला मिळत आहे. झोप पूर्ण होत नसल्याने विस्मरण, स्वभावामध्ये बदल, रोगप्रतिकार क्षमता कमी होणे, मधुमेहाची समस्या निर्माण होणे, शारीरिक असमतोलपणा निर्माण होणे, हृदयविकाराला कारणीभूत ठरणे, वजन कमी होणे, उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवणे आदी बाबी झोप पूर्ण न झाल्याने होऊ शकतात. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामत: अनेकांना हा निद्रानाशाचा त्रास जाणवत असून त्याचा एकूण परिणाम आरोग्यावर होत आहे.

कोरोना आणि मोबाईलच्या जास्त वापरामुळे झोप कमी होत असल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. यावर काळजी घेणे नितांत महत्त्वाचे आहे.

बॉक्स

झोप का उडते...

आधुनिकीकरणात जीवनशैली बदलून गेली आहे. कामाचा ताण, विचारांचा अतिरेक व अन्य कारणांमुळे झोप उडत असते. याला विविध कारणेही अभिप्रेत असतात. याशिवाय शारीरिक व्याधींमुळेही झोप लागत नाही. अशावेळी औषधोपचार करावा.

बॉक्स

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

एखाद्या व्यक्तीला झोप लागत नसेल, शारीरिक व्याधी असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेऊ नये. साधारणत: झोप लागत नसेल तर गोळी घेऊ शकता. मात्र अन्य कारण असेल तर उपचाराला प्राथमिकता द्यावी.

कोट

अकारण चिंता, अतिरिक्त काळजी घेणे, क्षमतेपेक्षा जास्त काळ मोबाईल पाहणे, खानपाण्याची सवय बदलणे यामुळे झोप लागत नाही. यावर उपाय म्हणून ठरलेल्या वेळेत झोप पूर् करण्याचा प्रयत्न करावा.

- डॉ. अमित कावळे, भंडारा

कोट

झोप पूर्ण न झाल्याने त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. मेंदूला त्याचे कार्य करण्यासाठी रेस्ट अवरची गरज असते. त्यामुळे झोप पूर्ण झाली पाहिजे. यामुळे बहुतांश मानसिक तणाव दूर होतो. कोरोना काळात मानसिक व शारीरिक व्याधी उत्पन्न झाल्याची उदाहरणे आहेत.

- डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा