शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा रोपांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST

भंडारा : संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण ...

भंडारा : संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी आयुर्वेदिक औषधे, परिसरातील विविध औषधी वनस्पतींचा काढा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहेत. त्यामुळे आता आपल्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या वन औषधांचे महत्त्व कोरोनामुळे वाढत आहे. यामध्ये विशेष करून तुळस, अश्वगंधा, अद्रक, गिलोय, गुळवेल, पुदिना, गवती चहा, कोरफड, शतावरी, कडुनिंब, पिंपळ या वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत आहे. परिसरात सर्वत्र आढळून येणाऱ्या कडुनिंबासह गवती चहाचा आज मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विविध रोपवाटिकांमध्ये या रोपांच्या मागणीतही वाढ झाली आहे. कडुनिंबाच्या पानाचा, सालीचा काढा तसेच पानांचा ज्यूस काढून तसेच चहामध्ये अद्रक, गवती चहासारख्या वनस्पतींचा नागरिक आज आवर्जून वापर करीत आहेत. एकंदरीत नैसर्गिक वनसंपत्तीने विपुल असलेल्या भंडारा जिल्ह्यात आयुर्वेदिक औषधे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही यामुळे राेजगार मिळत आहे. दररोज औषधांचा आयुर्वेदिक औषधांचा वापर हा नित्यनेमाने केला जात आहे. ज्यांना आयुर्वेदिक औषधाचे महत्त्व माहीत आहे, असे लोक घरच्या घरी कुंड्यांमध्ये तुळस, गवती चहा, अश्वगंधा या रोपांची लागवड करण्यासाठी नर्सरीमध्ये रोपांची मागणी करीत आहेत. सुरुवातीला शोभेच्या रोपट्यांची घरी कुंडीत लागवड केली जायची. मात्र आता त्या ऐवजी औषधी रोपट्यांना मागणी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बॉक्स

या रोपांना आहे प्रचंड मागणी

१. तुळस

तुळस ही एक सर्वत्र आढळणारी बहुगुणी औषधी वनस्पती आहे. त्यामुळेच आजही प्रत्येकाच्या दारासमोर तुळस लावण्यात येते. तुळशीचा महत्त्वाचा फायदा खोकला, विषदोष, दमा, उचकी लागणे, खवखव होणे तसेच मळमळ होत असल्यास तुळशीच्या पानांचा वापर उपयुक्त ठरतो. तसेच छातीमध्ये जळजळ, वातदोषाचे शमन करण्यासह तुळस दुर्गंधीचा नाश करते. तसेच तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचा महत्त्वाचा गुणधर्मही आहे.

२. अश्वगंधा

अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी इम्प्लीमेंटरीचे महत्त्वाचे गुण असतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्येपासून सुटका होते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी आणखीन मजबूत होतात. त्यासोबतच कोलेस्टेरॉलचा खराब स्तरही कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते.

३. अद्रक

आज घरोघरी प्रत्येकजण चहामध्ये आवर्जून अद्रकचा म्हणजेच आल्याचा वापर करत आहेत. द्रकमध्ये ऑंटीफंगल, ॲंटिसेप्टिक, बायोटीक व्हायरल असे विशेष गुण आहेत. त्याबरोबरच विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजेदेखील असल्याने आपल्या स्वास्थ्यासाठी कोरोनाकाळात अद्रक महत्त्वाची व मोलाची भूमिका निभावत असल्याने आज आल्याची प्रचंड मागणी बाजारात वाढली आहे.

४. गुळवेल

गुळवेल या रोपाला अमृता असेही अनेक ठिकाणी संबोधले जाते. अस्थमा व श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीला गुळवेल या रोपाचा प्रचंड फायदा होतो. गुळवेल या रोपाच्या काढ्याचा रस काढला जातो आणि तो काढ्याच्या स्वरूपात प्राशन करण्यास दिला जातो. याचा मानवी आरोग्याला चांगला फायदा होतो.

५. अडुळसा

अडुळसा ही आपल्या परिसरातील एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने उगाळून घेतल्यास त्यापासून जो रस तयार होतो, तो रस काढ्याच्या स्वरूपात घेतल्यास शरीरात अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त असून त्याच्या रोपांची मागणीही सध्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

कोट

सध्या कोरोना वाढला असल्याने नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. ज्यांना औषधी वनस्पतींची जाण आहे, ते लोक कडुनिंब, गवती चहा, गुळवेल, वड, पिंपळ अशा रोपांची आमच्याकडे मागणी करत आहेत. औषधी वनस्पतींमध्ये मोठी ताकद आहे. ज्या जाणकारांना हे माहीत आहे ते लोक खरेदीसाठी येत आहेत. आम्ही नर्सरीमध्ये अशी रोपे तयार करून विक्री करीत आहोत.

मंगलमूर्ती येरणे, नर्सरीचालक, आसोला.

कोट

कोरोनामुळे औषधी वनस्पतींचा वापर वाढला आहे. याचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपणही घरच्या घरी बागेत अथवा गच्चीवर ही रोपे छोट्या कुंड्यांमध्ये लावू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग केल्यास आपले शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. भंडारा तालुक्यात अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेचा दोन शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. त्यांनाही औषधी वनस्पतींबद्दल मार्गदर्शन करीत आहे.

अविनाश कोटांगले, भंडारा तालुका कृषी अधिकारी