शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
3
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
4
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
5
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
6
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
7
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
8
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
9
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
10
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
11
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
12
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
13
Astrology Predictions 2026 : ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
15
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
16
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
17
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
18
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
19
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
20
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीने गावखेड्यातील अर्थव्यवस्था विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST

पालांदूर : एप्रिल महिन्यापासून कोरोना वाढल्याने संचारबंदी लागू केली आहे. या जीवघेण्या महामारीने गावखेड्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. खरीप हंगाम ...

पालांदूर : एप्रिल महिन्यापासून कोरोना वाढल्याने संचारबंदी लागू केली आहे. या जीवघेण्या महामारीने गावखेड्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना व्यापारीवर्गासह शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

एप्रिल, मे महिना लाॅकडाऊनमध्ये जात आहे. जून कसा निघेल हे सांगता येत नाही. संपूर्ण जनता धास्तावली आहे. लाॅकडाऊन झाल्याने घरात राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे घरातील अर्थव्यवस्था विस्कटली असून आर्थिक घडी बिघडली आहे. महामारीपुढे कोणाचेच काही चालेना असे झाले आहे.

मजूरवर्ग मात्र मिळेल तिथं काम शोधत आहेत. शेती हा एकच उपाय कामासाठी शोधला जात आहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर देशाचा आर्थिक डोलारा उभा असला तरी त्याच्याकडे लक्ष मात्र कोणीच देत नाही. गत हंगामातील बोनससुद्धा शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही. हप्त्याभरापूर्वी दिवाळीत विकलेल्या धानाचे पैसे मिळाले. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत राहिले. चालू पीक कर्जाचे वाटप सुरू झाले. पात्र शेतकरी दिवस-रात्र एक करीत कर्जाकरिता सरसावलेले आहेत. हाती पैसा नसल्याने मिळेल तिथून पैशाची जमवाजमव सुरू आहे. मजुरांना कामावर बोलावल्यानंतर त्यांना पैसे देणे भाग आहे. दररोज कुटुंबाचा गाडा हाकण्याकरिता पैशाची नितांत गरज आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर हे एकमेकाला पूरक आहेत. बळिराजाकडे पैसा असेल तरच मजूरसुद्धा आपला संसारिक गाडा चालवतो. शेतकरी स्वतःजवळ पैसे ठेवणार नाही. मात्र, मजुराला दिल्याशिवाय राहणार नाही, असेही चित्र आहे. महिनाकाठीच व्यापाराची उधारी दिली जाते. जुने देणे, नवीन घेणे असा हा गावखेड्यातला व्यवहार चक्र सुरू आहे. परंतु कोरोनाने याही व्यवहाराला तिलांजली देत नगदी व्यवहारालाच किंमत आली आहे. दररोजचा दुकानदारसुद्धा उधारी बंद असे सांगत आहे. शासन स्तरावरून ठोस उपाययोजना नसल्याने गावखेड्यातील अर्थव्यवस्थेचा गाडा मंदावला आहे.

व्यापार, मोटार वाहतूकदार संकटात आहेत. बाजारपेठा बंद असल्या तरीही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. मात्र, यात नेहमीप्रमाणे सुरू असलेला नगदी उधारीचा व्यवहार आता प्रभावी झालेला आहे. नगदी रुपये असतील तरच माल मिळतो, अन्यथा माल संपला असे सांगितले जाते. त्यामुळे व्यावसायिक काही जेवढे पैसे असतील तेवढाच माल खरेदी करतो.

मोटार वाहतूकदार सगळेच संकटात आले आहेत. गाडीचे हप्ते थकलेले आहेत. बँकांचे कर्ज व्याजासह वाढत आहेत. दररोजचे उत्पन्न शून्यावर आले आहे. तरुणाई कावरीबावरी झालेली आहे. आम्ही करावे काय? असा प्रश्न आहे. ज्येष्ठांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचाच शासनाकडे निधी थकीत आहे.