शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

कोरोना महामारीने गावखेड्यातील अर्थव्यवस्था विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST

पालांदूर : एप्रिल महिन्यापासून कोरोना वाढल्याने संचारबंदी लागू केली आहे. या जीवघेण्या महामारीने गावखेड्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. खरीप हंगाम ...

पालांदूर : एप्रिल महिन्यापासून कोरोना वाढल्याने संचारबंदी लागू केली आहे. या जीवघेण्या महामारीने गावखेड्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना व्यापारीवर्गासह शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

एप्रिल, मे महिना लाॅकडाऊनमध्ये जात आहे. जून कसा निघेल हे सांगता येत नाही. संपूर्ण जनता धास्तावली आहे. लाॅकडाऊन झाल्याने घरात राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे घरातील अर्थव्यवस्था विस्कटली असून आर्थिक घडी बिघडली आहे. महामारीपुढे कोणाचेच काही चालेना असे झाले आहे.

मजूरवर्ग मात्र मिळेल तिथं काम शोधत आहेत. शेती हा एकच उपाय कामासाठी शोधला जात आहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर देशाचा आर्थिक डोलारा उभा असला तरी त्याच्याकडे लक्ष मात्र कोणीच देत नाही. गत हंगामातील बोनससुद्धा शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही. हप्त्याभरापूर्वी दिवाळीत विकलेल्या धानाचे पैसे मिळाले. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत राहिले. चालू पीक कर्जाचे वाटप सुरू झाले. पात्र शेतकरी दिवस-रात्र एक करीत कर्जाकरिता सरसावलेले आहेत. हाती पैसा नसल्याने मिळेल तिथून पैशाची जमवाजमव सुरू आहे. मजुरांना कामावर बोलावल्यानंतर त्यांना पैसे देणे भाग आहे. दररोज कुटुंबाचा गाडा हाकण्याकरिता पैशाची नितांत गरज आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर हे एकमेकाला पूरक आहेत. बळिराजाकडे पैसा असेल तरच मजूरसुद्धा आपला संसारिक गाडा चालवतो. शेतकरी स्वतःजवळ पैसे ठेवणार नाही. मात्र, मजुराला दिल्याशिवाय राहणार नाही, असेही चित्र आहे. महिनाकाठीच व्यापाराची उधारी दिली जाते. जुने देणे, नवीन घेणे असा हा गावखेड्यातला व्यवहार चक्र सुरू आहे. परंतु कोरोनाने याही व्यवहाराला तिलांजली देत नगदी व्यवहारालाच किंमत आली आहे. दररोजचा दुकानदारसुद्धा उधारी बंद असे सांगत आहे. शासन स्तरावरून ठोस उपाययोजना नसल्याने गावखेड्यातील अर्थव्यवस्थेचा गाडा मंदावला आहे.

व्यापार, मोटार वाहतूकदार संकटात आहेत. बाजारपेठा बंद असल्या तरीही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. मात्र, यात नेहमीप्रमाणे सुरू असलेला नगदी उधारीचा व्यवहार आता प्रभावी झालेला आहे. नगदी रुपये असतील तरच माल मिळतो, अन्यथा माल संपला असे सांगितले जाते. त्यामुळे व्यावसायिक काही जेवढे पैसे असतील तेवढाच माल खरेदी करतो.

मोटार वाहतूकदार सगळेच संकटात आले आहेत. गाडीचे हप्ते थकलेले आहेत. बँकांचे कर्ज व्याजासह वाढत आहेत. दररोजचे उत्पन्न शून्यावर आले आहे. तरुणाई कावरीबावरी झालेली आहे. आम्ही करावे काय? असा प्रश्न आहे. ज्येष्ठांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचाच शासनाकडे निधी थकीत आहे.