शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:36 IST

२०१९ मध्येही उष्माघाताने एकही जण मृत्यू पावला नाही, याची शासन दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी मे हिटचा ...

२०१९ मध्येही उष्माघाताने एकही जण मृत्यू पावला नाही, याची शासन दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी मे हिटचा तडाखा सर्वांनाच सहन करावा लागतो. तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा वेळी मानवी मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. मात्र, २०१९ पासून उष्माघातामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. गतवर्षी म्हणजेच २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बहुतांश काळ लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच होते. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात उष्णतेचा फटका अनेकांना जाणवला नाही. त्यामुळेच मानवीय जीवहानी झाली नाही. या वर्षी १७ मेपर्यंत तापमान वाढत असले, तरी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघात पळाला की काय, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, गत १७ दिवसांत तीन वेळा अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अधून-मधून उष्णतेची दाहकता लक्षात येत होती. मात्र, संचारबंदीमुळे सकाळी ११ वाजता नंतर रस्ते सामसूम होतात. नागरिकांची रहदारी कमी झाल्याने उन्हाची दाहकता कमी सोसावी लागत असल्याचे दृश्य सध्यातरी दिसत आहे.

बॉक्स

ऊन वाढले तरी...

या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढत होती. एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके जाणवू लागले. मे महिन्यात तर पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला. संचारबंदीमुळे नागरिक घरीच अडकून होते. ऊन वाढले, तरी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. सकाळी सात ते अकरा या वेळेतच नागरिक घराबाहेर सामान घेण्यासाठी बाहेर निघतात.

बॉक्स

उन्हाळा घरातच

गतवर्षी मार्च महिन्यात जनता कर्फ्यूनंतर सातत्याने नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी एप्रिल ते जून या कालावधीपर्यंत उन्हाळा तीव्र असतानाही उन्हाची दाहकता कुणालाच सहन करावी लागली नाही. मात्र, व्यापार व उद्योगांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. अनेकांना आर्थिक फटकाही बसला, परंतु दुसरीकडे उष्माघाताची कुठलीही समस्या पाहायला मिळाली नाही.

कोट

लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गतवर्षीपासून नागरिक उन्हाळ्यातही घरात आहे. गत तीन वर्षांपासून उष्माघातामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. उन्हापासून बचाव करण्याकरिता काळजी घेण्याची गरज आहे.

- अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा

तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी

२०१९ - ००

२०२०- ००

२०२१- ००