शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:36 IST

२०१९ मध्येही उष्माघाताने एकही जण मृत्यू पावला नाही, याची शासन दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी मे हिटचा ...

२०१९ मध्येही उष्माघाताने एकही जण मृत्यू पावला नाही, याची शासन दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी मे हिटचा तडाखा सर्वांनाच सहन करावा लागतो. तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा वेळी मानवी मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. मात्र, २०१९ पासून उष्माघातामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. गतवर्षी म्हणजेच २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बहुतांश काळ लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच होते. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात उष्णतेचा फटका अनेकांना जाणवला नाही. त्यामुळेच मानवीय जीवहानी झाली नाही. या वर्षी १७ मेपर्यंत तापमान वाढत असले, तरी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघात पळाला की काय, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, गत १७ दिवसांत तीन वेळा अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अधून-मधून उष्णतेची दाहकता लक्षात येत होती. मात्र, संचारबंदीमुळे सकाळी ११ वाजता नंतर रस्ते सामसूम होतात. नागरिकांची रहदारी कमी झाल्याने उन्हाची दाहकता कमी सोसावी लागत असल्याचे दृश्य सध्यातरी दिसत आहे.

बॉक्स

ऊन वाढले तरी...

या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढत होती. एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके जाणवू लागले. मे महिन्यात तर पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला. संचारबंदीमुळे नागरिक घरीच अडकून होते. ऊन वाढले, तरी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. सकाळी सात ते अकरा या वेळेतच नागरिक घराबाहेर सामान घेण्यासाठी बाहेर निघतात.

बॉक्स

उन्हाळा घरातच

गतवर्षी मार्च महिन्यात जनता कर्फ्यूनंतर सातत्याने नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी एप्रिल ते जून या कालावधीपर्यंत उन्हाळा तीव्र असतानाही उन्हाची दाहकता कुणालाच सहन करावी लागली नाही. मात्र, व्यापार व उद्योगांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. अनेकांना आर्थिक फटकाही बसला, परंतु दुसरीकडे उष्माघाताची कुठलीही समस्या पाहायला मिळाली नाही.

कोट

लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गतवर्षीपासून नागरिक उन्हाळ्यातही घरात आहे. गत तीन वर्षांपासून उष्माघातामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. उन्हापासून बचाव करण्याकरिता काळजी घेण्याची गरज आहे.

- अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा

तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी

२०१९ - ००

२०२०- ००

२०२१- ००