शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:36 IST

२०१९ मध्येही उष्माघाताने एकही जण मृत्यू पावला नाही, याची शासन दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी मे हिटचा ...

२०१९ मध्येही उष्माघाताने एकही जण मृत्यू पावला नाही, याची शासन दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी मे हिटचा तडाखा सर्वांनाच सहन करावा लागतो. तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा वेळी मानवी मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. मात्र, २०१९ पासून उष्माघातामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. गतवर्षी म्हणजेच २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बहुतांश काळ लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच होते. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात उष्णतेचा फटका अनेकांना जाणवला नाही. त्यामुळेच मानवीय जीवहानी झाली नाही. या वर्षी १७ मेपर्यंत तापमान वाढत असले, तरी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघात पळाला की काय, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, गत १७ दिवसांत तीन वेळा अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अधून-मधून उष्णतेची दाहकता लक्षात येत होती. मात्र, संचारबंदीमुळे सकाळी ११ वाजता नंतर रस्ते सामसूम होतात. नागरिकांची रहदारी कमी झाल्याने उन्हाची दाहकता कमी सोसावी लागत असल्याचे दृश्य सध्यातरी दिसत आहे.

बॉक्स

ऊन वाढले तरी...

या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढत होती. एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके जाणवू लागले. मे महिन्यात तर पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला. संचारबंदीमुळे नागरिक घरीच अडकून होते. ऊन वाढले, तरी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. सकाळी सात ते अकरा या वेळेतच नागरिक घराबाहेर सामान घेण्यासाठी बाहेर निघतात.

बॉक्स

उन्हाळा घरातच

गतवर्षी मार्च महिन्यात जनता कर्फ्यूनंतर सातत्याने नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी एप्रिल ते जून या कालावधीपर्यंत उन्हाळा तीव्र असतानाही उन्हाची दाहकता कुणालाच सहन करावी लागली नाही. मात्र, व्यापार व उद्योगांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. अनेकांना आर्थिक फटकाही बसला, परंतु दुसरीकडे उष्माघाताची कुठलीही समस्या पाहायला मिळाली नाही.

कोट

लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गतवर्षीपासून नागरिक उन्हाळ्यातही घरात आहे. गत तीन वर्षांपासून उष्माघातामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. उन्हापासून बचाव करण्याकरिता काळजी घेण्याची गरज आहे.

- अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा

तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी

२०१९ - ००

२०२०- ००

२०२१- ००