शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

स्वयंपाक घरातून तांब्याची भांडी कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:33 IST

अधिकमास सुरू झाला आहे. या मासात जावयाला तांब्याचे भांडे भेट दिले जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीचा परिणाम या प्रथा व परंपरेवर होत असल्याचे दिसते. प्राचीन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसते.

ठळक मुद्देमहागाईचे सावट : फायबरच्या भांड्यांचा वाढता वापर

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : अधिकमास सुरू झाला आहे. या मासात जावयाला तांब्याचे भांडे भेट दिले जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीचा परिणाम या प्रथा व परंपरेवर होत असल्याचे दिसते.प्राचीन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसते. त्यांची जागा आता स्टेनलेस स्टील व फायबरच्या भांड्यांनी घेतली आहे. आरोग्य सुदृढ रहावे यासाठी पूर्वीच्या काळी तांब्याची भांडी वापरली जात असत. मात्र कालौघात तांब्याची भांडी दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे.नव्या पिढीकडून रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यांसह अन्य जुन्या काळातील वस्तूंचा वापर होत नसल्याचे दिसते. यातच तांब्याची भांडीदेखील हद्दपार करुन आता फायबर व स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे. सध्याच्या काळात केवळ गरजेपुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होताना दिसतो. धार्मिक कार्यात आजही आवर्जून तांब्याची भांडी वापरली जातात.तांबा या धातूचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. तांबा वाहक असल्यामुळे विद्युत करंट पुरवठ्यासाठी या तारांचा उपयोग केला जातो. रबरची कोटींग असलेल्या तांब्याच्या तारांचा उपयोग वायर म्हणून घरातील वीज जोडणीसाठी केला जातो.तांबा हा धातू बहुगुणी असून आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो.तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने अनेक आजार नाहिसे होतात, असे तज्ज्ञ सांगतात. स्टीलच्या भांड्यांपेक्षा तांब्याच्या भांड्यांचा वापर अधिक होत असलेले स्वयंपाकघर आता दुर्मिळच झाल्याचे चित्र आहे. तांबे हे खाद्यपदार्थातील विषाणूंचा नायनाट करते, असे सांगतात. मात्र ग्रामीण भागासह शहरातूनही तांब्याची भांडे हद्दपार होत असल्याचे दिसून येते.सुदृढ आरोग्यात सहायकप्राचीन काळापासून होत असलेल्या तांब्याच्या भांड्यांचा वापरावर विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे. दैनंदिन वापरात स्टील, फायबर यांचा वापर वाढला आहे. या वस्तूंवर विषाणू जमल्यास त्याचा नायनाट लवकर होत नाही. ही बाब आरोग्याकरिता धोक्याची ठरते.