शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

काँग्रेसच्या आनंदोत्सवाला पोलिसांचा मज्जाव

By admin | Updated: June 26, 2017 00:25 IST

स्थानिक गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा करण्यात येत असतानाच भंडारा शहर पोलिसांनी आतषबाजी करण्यास मज्जाव केला.

प्रकरण कर्जमुक्तीचे : आतषबाजी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्थानिक गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा करण्यात येत असतानाच भंडारा शहर पोलिसांनी आतषबाजी करण्यास मज्जाव केला. यात विजयोत्सव साजरा करण्याची परवानगी नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केले असले तरी काँग्रेसने या प्रकाराला लोकशाही मुल्यांची अध:पतन असे म्हटले आहे. दुसरीकडे विजयोत्सव साजरा करणारच अशी भूमिका काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येऊन तनावपूर्ण परिस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, कर्जमाफी देणे शक्य नाही असे म्हणणा-या सरकारला आज कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला हा शेतकरी एकजुटीचा आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा विजय आहे. काँग्रेस पक्षाने रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची ही मागणी कायम आहे. तसेच ही कर्जमाफी देशातील आजतागायची सर्वात मोठी कर्जमाफी आहे असे म्हणणे ही राज्यातील जनतेची दिशाभूल आहे. काँग्रेसच्या केंद्र व राज्य सरकारने २००८ साली दिलेली कर्जमाफी अजूनही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी होती, असेही त्यांनी ठासून सांगितले. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या निर्णयावर गणवीर म्हणाले, काँग्रेस पक्षाने सातत्याने शेतकरी कर्जमाफीचा विषय लावून धरला होता. सरकारने १ लाख ५० हजार रूपयांच्या मयार्देत कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे दीड लाखांपेक्षा जास्त कृषीपूरक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या कर्जमाफीचा पूर्ण लाभमिळणार नाही त्यामुळे रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांची कर्ज माफ करावीत ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम आहे. तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना २५ हजारांची मदत अत्यल्प आहे ती वाढवावी. आता शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना तात्काळ बेबाकी प्रमाणपत्र देऊन नविन कर्जवाटप सुरु करावे, शेतक-यांना १० हजार रुपए मदत देताना जशा जाचक अटी घातल्या आहेत तशा अटी घालून शेतक-यांना लाभापासून वंचित ठेवू नये, अशीही मागणी आहे.यावेळी महेंद्र निंबार्ते, धनराज साठवणे, सचिन घनमारे, अनु.जाती. जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, प्रशांत देशकर, माजी नगरसेवक पृथ्वी तांडेकर, नगरसेविका जयश्री बोरकर, आशा तिवाडे, सुषमा वरगंटीवार, गणेश निमजे, हिरामण लांजेवार, शेख नबाब, जनार्धन निंबार्ते, प्रा मारबते, प्रशांत सरोजकर, विनीत देशपांडे, रवीकुमार येरखेडे, नाहीद परवेज आदी उपस्थित होते.