शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना हवाय लोकसंख्येवर आधारित आरक्षणात वाटा

By admin | Updated: September 30, 2015 00:52 IST

सद्यस्थितीत भारतात ६० ते ६५ टक्के लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे.

पवनी येथे अधिवेशन : प्रदीप ढोबळे यांचे प्रतिपादनपवनी : सद्यस्थितीत भारतात ६० ते ६५ टक्के लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. त्यांचे भरवशावर राजकारण सुरू आहे. परंतु जेव्हा जनगणना केली जाते तेव्हा ओबीसींना वगळून इतरांची प्रवर्गानुसार जनगणना केल्या जात नाही. सरकारची हिच मानसिकता बदलायला हवी. स्वातंत्र्यपुर्व काळात जातीय आधारावर जनगणना करण्यात आली. तेव्हाच ओबीसी समाज ५२ टक्के होता. त्यामुळे त्या आकड्यांना आधार मानले तरी ओबीसींना ५२ टक्के आरक्षणात वाटा असावा असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी केले.स्थानिक गांधी भवनात ओबीसी सेवा संघाच्या तालुकास्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. गांधीजी राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारखे महापुरूष सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढले. ओबीसी समाजाने सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सज्ज झाले पाहिजे. त्याशिवाय आपले हक्क मिळणार नाही, असे विचार इंजि. ढोबळे यांनी व्यक्त केले.दीप प्रज्वलीत करून अधिवेशनाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपिठावर बालरोगतज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा बेहरे गावतुरे, सेवा संघाचे समन्वयक विजय तपाडकर, भंडारा जिल्हा अध्यक्ष गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, महेंद्र धावडे, माजी जि.प. सदस्य मोहन पंचभाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. अभिलाषा बेहरे यांनी ओबीसी समाज देशातील मुळनिवास आहे. मात्र परकियांच्या आक्रमणानंतर परकिय सत्ताधिश झाले व मुळनिवासी गुलाम बनले. समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी समाजसुधारकांनी प्रयत्न केले. एखाद्या कंपनीत देखिल ५१ टक्के भागभांडवत असलेला गृहस्थ कंपनीचा मालक बनतो परंतु या देशात ओबीसी ६० ते ६५ टक्के असूनही सत्तेपासून दूर लोटला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते विजय तपाडकर यांनी देशात साडेबारा असलेला समाज सातत्याने सत्ताधिश आहे परंतू ओबीसी अठरापगड जातीमध्ये विभागले असल्याने एकत्र नाही त्यामुळे आपण आपल्या अधिकारापासून वंचित आहोत, असे विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर यांनी विचार व्यक्त केले. सेवा संघाचे कार्यकर्ते श्रीकृष्ण पडोळे, हाडग गुरूजी, सुनंदा मुंडले, डॉ. प्रती राखडे, राम भेंडारकर, अरविंद काकडे, डॉ. राजेश नंदुरकर, डॉ. अतुल दोनोडे, अशोक पारधी यांनी अतिथींचे स्वागत केले. प्रास्ताविक उमाजी देशमुख, संचालन डॉ. विक्रम राखडे तर आभार प्रदर्शन रविंद्र रायपूरकर यांनी केले. तालुका ओबीसी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष डॉ. विक्रम राखडे व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी वाहिले अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)