शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

टीव्हीमुळे बालकांवर विपरीत परिणाम

By admin | Updated: April 8, 2015 00:51 IST

आधुनिक युगात मैदानी खेळांकडे पाठ फिरवून मुले तपासन्तास टी.व्ही. बघतात त्याचा विपरित परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यांवर होत ..

उन्हाळी शिबिर : छगन राखडे यांचे प्रतिपादनमासळ : आधुनिक युगात मैदानी खेळांकडे पाठ फिरवून मुले तपासन्तास टी.व्ही. बघतात त्याचा विपरित परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यांवर होत असून सतत ३ ते ४ तास टी.व्ही. पाहिल्याने मुलांचा बुद्धयांक कमी होवून एकाग्रता नष्ट होते, असे प्रतिपादन डॉ. छगन राखडे, बालरोग तज्ञ ग्रामीण रुग्णालय पालांदूर यांनी सुबोध विद्यालयात आयोजित उन्हाळी शिबिर कार्यक्रमात केले.आजची मुले ही टी.व्ही. मोबाईलचे आहारी गेलेले आहेत. त्यांची जीवनशैली पुर्णत: बदलत आहे. ही बाब मुलांच्या आरोग्याला हानीकारक आहे. टी.व्ही. मुळे बालगुन्हेगारी, चिडचिडपणा, स्थुलता, चक्कर येणे, थकवा असे अनेक आजारांना मुले बळी पडत आहेत. स्थुलता वाढल्यामुळे अकाली मधुमेह, उच्चरक्तदाब इत्यादी घत्ततक आजार मुलांमध्ये दिसून येत आहेत. डॉ. छगन राखडे यांनी शालेय विद्यार्थी, स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, शारीरिक व मानसीक आरोग्य टिकविण्यासाठी मुलांचे मन व शरीर सुदृढ ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी प्राणायाम, जॉगिंग, मैदानी खेळ मुलांनी नियमित खेळले पाहिजेत. त्याचबरोबर, संतुलीत आहार घेवून, फास्टफुड, जंकफुड, चायनिज फुड टाळायला पाहिजेत, असेही त्यांनी मार्गदर्शनातून सांगितले. अशाप्रकारच्या अन्नातून अनावश्यक कॅलरिज शरीरात जातात. स्थुलता वाढते. मुलांनी उघड्सावरचे खावू नये, चॉकलेट, तंबाखूजन्य पदार्थ, चहा या गोष्टी मुलांसाठी अपायकारक आहेत. मुलांच्या आहारात, फळे, भाज्या, रताळे, ज्वारी, नाचणी, लिंबुवर्गीय फळे यांचा भरपूर वापर करायला पाहिजे. अंगावर कपडे घालताना सैल, सूती कपडेच घालावे, सूर्यकिरणे आपल्या शरीरावर पडतील यांची काळजी घ्यावी. दररोज दोनवेळा आंघोळ, ब्रश करावे, डोळे, केस यांची काळजी घ्यावी, तंबाखूजन्य पदार्थ, बिडी, सिगारेट यांचे सेवन टाळून मुखरोग, कर्करोग टाळता येवू शकतात. असेही त्यांनी मार्गदर्शन केले. संचालन व्ही.टी. सार्वे यांनी तर आभार प्रदर्शन आर.के. घोनमोडे यांनी केले. (वार्ताहर)