शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

टीव्हीमुळे बालकांवर विपरीत परिणाम

By admin | Updated: April 8, 2015 00:51 IST

आधुनिक युगात मैदानी खेळांकडे पाठ फिरवून मुले तपासन्तास टी.व्ही. बघतात त्याचा विपरित परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यांवर होत ..

उन्हाळी शिबिर : छगन राखडे यांचे प्रतिपादनमासळ : आधुनिक युगात मैदानी खेळांकडे पाठ फिरवून मुले तपासन्तास टी.व्ही. बघतात त्याचा विपरित परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यांवर होत असून सतत ३ ते ४ तास टी.व्ही. पाहिल्याने मुलांचा बुद्धयांक कमी होवून एकाग्रता नष्ट होते, असे प्रतिपादन डॉ. छगन राखडे, बालरोग तज्ञ ग्रामीण रुग्णालय पालांदूर यांनी सुबोध विद्यालयात आयोजित उन्हाळी शिबिर कार्यक्रमात केले.आजची मुले ही टी.व्ही. मोबाईलचे आहारी गेलेले आहेत. त्यांची जीवनशैली पुर्णत: बदलत आहे. ही बाब मुलांच्या आरोग्याला हानीकारक आहे. टी.व्ही. मुळे बालगुन्हेगारी, चिडचिडपणा, स्थुलता, चक्कर येणे, थकवा असे अनेक आजारांना मुले बळी पडत आहेत. स्थुलता वाढल्यामुळे अकाली मधुमेह, उच्चरक्तदाब इत्यादी घत्ततक आजार मुलांमध्ये दिसून येत आहेत. डॉ. छगन राखडे यांनी शालेय विद्यार्थी, स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, शारीरिक व मानसीक आरोग्य टिकविण्यासाठी मुलांचे मन व शरीर सुदृढ ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी प्राणायाम, जॉगिंग, मैदानी खेळ मुलांनी नियमित खेळले पाहिजेत. त्याचबरोबर, संतुलीत आहार घेवून, फास्टफुड, जंकफुड, चायनिज फुड टाळायला पाहिजेत, असेही त्यांनी मार्गदर्शनातून सांगितले. अशाप्रकारच्या अन्नातून अनावश्यक कॅलरिज शरीरात जातात. स्थुलता वाढते. मुलांनी उघड्सावरचे खावू नये, चॉकलेट, तंबाखूजन्य पदार्थ, चहा या गोष्टी मुलांसाठी अपायकारक आहेत. मुलांच्या आहारात, फळे, भाज्या, रताळे, ज्वारी, नाचणी, लिंबुवर्गीय फळे यांचा भरपूर वापर करायला पाहिजे. अंगावर कपडे घालताना सैल, सूती कपडेच घालावे, सूर्यकिरणे आपल्या शरीरावर पडतील यांची काळजी घ्यावी. दररोज दोनवेळा आंघोळ, ब्रश करावे, डोळे, केस यांची काळजी घ्यावी, तंबाखूजन्य पदार्थ, बिडी, सिगारेट यांचे सेवन टाळून मुखरोग, कर्करोग टाळता येवू शकतात. असेही त्यांनी मार्गदर्शन केले. संचालन व्ही.टी. सार्वे यांनी तर आभार प्रदर्शन आर.के. घोनमोडे यांनी केले. (वार्ताहर)