शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

सदनिकेतील कचरा जाळणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:43 IST

स्वच्छ भारत अभियान देशात राबविले जात आहे. रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशी तिकीटावर 'एक कदम स्वच्छता की ओर' असे नमूद करीत आहे. परंतु तुमसर रोड येथे रेल्वे प्रशासनाकडून कचरा दररोज जाळणे सुरू आाहे. गोंदिया मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे परिसरात हा प्रकार सुरु आहे.

ठळक मुद्देतुमसर रोड रेल्वे परिसरातील प्रकार : स्वच्छ भारत अभियानावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : स्वच्छ भारत अभियान देशात राबविले जात आहे. रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशी तिकीटावर 'एक कदम स्वच्छता की ओर' असे नमूद करीत आहे. परंतु तुमसर रोड येथे रेल्वे प्रशासनाकडून कचरा दररोज जाळणे सुरू आाहे. गोंदिया मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे परिसरात हा प्रकार सुरु आहे. कचराची विल्हेवाट लावावी असे निर्देश प्रशासनाने दिले आहे. कचरा जाळू नये असे आदेश असताना मागील अनेक महिन्यापासून कचरा जाळणे सुरुच आहे.तुमसर रोड रेल्वे जंक्शन असून येथे रेल्वेची कार्यालये तथा रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सदनिका आहेत. सदनिकेत दररोज ओला व सुका कचरा निघतो. घंटागाडीद्वारे सदर कचरा गोंदिया मार्गावर रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे हद्दीतील रस्त्याशेजारी आणून घातला जातो. त्यानंतर सदर कचरा जाळण्यात येत आहे. दररोज कचरा जाळल्याने येथे राख रस्त्याशेजारी पडून आहे.रेल्वे प्रशासनाने कचराची विल्हेवाट लावावी, परंतु कचरा जाळू नये, असे आदेश दिले आहेत. कचºयावर आधारित प्रकल्प तयार करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आली आहे. येथे मागील अनेक महिन्यापासून सर्रास कचरा जाळण्यात येत आहे. तुमसर रोड येथे रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी वास्तव्याला आहेत. त्यांचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. रेल्वे प्रशासन स्वच्छ भारत अभियान मोठा गाजावाजा करून राबवित आहे, परंतु त्या अभियानाचा येथे विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक शहर, गावात कचरा जाळण्यास बंदी असताना केंद्र शासनाच्या रेल्वेत मात्र कचरा सर्रास जाळणे सुरुच आहे.स्वच्छ भारत अभियान राबविणे सुरु असून कचरा जाळण्याची परवानगी कुणी दिली. कचरा जाळल्याने धूर निघून राख तयार होत आहे. त्याची विल्हेवाट कोण लावणार? रेल्वे प्रशासनाने तात्काळ कचरा जाळणे बंद करावे.-सुधाकर कारेमोरे,उपजिल्हा प्रमुख,शिवसेना, तुमसर.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान