शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नद्या काठावरील गावात दूषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा, बावणथडी नद्याचे काठावर असणाऱ्या सिहोरा परिसरातील गावात दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत ...

चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा, बावणथडी नद्याचे काठावर असणाऱ्या सिहोरा परिसरातील गावात दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांवर जलजन्य आजाराचे संकट ओढवले आहे. गावात आजाराची साथ येण्याची शक्यता आहे. नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. गावात कावीळचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने गावठी उपचारासाठी नागरिक धाव घेत आहेत. यात प्रशासन बेखबर असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावानंतर नागरिक बाहेर पडत असताना नव्या संसर्ग जलजन्य आजाराच्या गर्तेचे संकट प्रतीक्षा करीत आहे.

सिहोरा परिसरातून वैनगंगा, बावणथडी नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत. या नळयोजनांना जलशुद्धीकरणाची सोय नसल्याने गढूळ व दूषित पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. पावसाळ्याचे पाहिले पाणी नदी पात्रात पोहोचले असून पाणी गढूळ झाले आहे. गढूळ व दूषित पाणी नागरिकांना नळ योजनेने उपलब्ध केले जात आहेत. ग्रामपंचायतीने पाण्याचे टाकीत ब्लिचिंग पावडरचे मिश्रण करीत असले तरी जलशुद्धीकरण होत नाही. पाण्याचा लाल व पिवळसर रंग बदलत नाही. या दूषित व गढूळ पाण्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

लहान बालकांतील कावीळचे वाढते प्रमाण असल्याने पालकांच्या मनात रोष आहे. गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी अद्याप पुढाकार घेतला नाही. नळ योजना असणाऱ्या गावांत नागरिक हातपंपाच्या पाण्यावर तहान भागविण्यासाठी धाव घेत आहेत. सुकली नकुल, सिहोरा, येरली अशा तीन योजना परिसरात आहेत. परंतु यात सिहोरा गावातील योजना वगळता दोन्ही योजना आटल्या आहेत. दोन्ही योजना भंगारात निघाल्या आहेत. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे बाबतीत शासनाची उदासीनता नागरिकांचे जिवावर बेतणारी ठरत आहे. परंतु कुणी गंभीर होताना दिसत नाही.

बॉक्स

सुकली प्रादेशिक योजना सुरु करा

बपेरा गावांचे हद्दीत असणाऱ्या सुकली नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला संजीवनी देण्याची ओरड नागरिक करीत आहेत. बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना ही योजना पाणीपुरवठा करीत आहे. परंतु या योजनेला गुंडाळण्यात आल्याने शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित झाले आहेत. पावसाळ्याचे तीन महिने या योजनेचे पाणीपुरवठा करण्याची मागणी युवा नेते किशोर राहगडाले, भाजयुमोचे विनोद पटले, सरपंच वैशाली पटले, ग्रामपंचायत सदस्या शीतल चिंचखेडे, सरपंच पारस भुसारी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र बघेले, सामाजिक कार्यकर्ते यादोराव बोरकर, सरपंच ममता राऊत, माजी सरपंच हरिकिशन बनकर यांनी केली आहे.