शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

कारखान्यातील दूषित पाणी शिरले शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST

मोहाडी : कारखान्यातील केमिकलमिश्रित पाणी कालव्यात सोडले जात असून, ते पाणी सरळ शेतात जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचे रब्बी पीक ...

मोहाडी : कारखान्यातील केमिकलमिश्रित पाणी कालव्यात सोडले जात असून, ते पाणी सरळ शेतात जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचे रब्बी पीक नष्ट झाले आहे. रसायनयुक्त पाणी त्वरित बंद करण्यात यावे, तसेच शाखा अभियंत्याला निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी मोहाडी तालुका शिवसेनेतर्फे आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता देव्हाडा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे.

देव्हाडा बूज येथील मानस साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून, पूर्ण शक्तीने साखर निर्मिती सुरू आहे. या प्रक्रियेसाठी वापरून झालेले केमिकलयुक्त पाणी ज्यात सल्फर, ॲसिड, गंधक, चुना असतो, असे घाणयुक्त पाणी चोरखमारा नहरात सोडले जात आहे. नहराच्या माध्यमातून हे विषयुक्त निळ्या रंगाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने गहू, हरभरा, लाखोळी, जवस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हिरामण शेंडे यांचा गहू पूर्ण नष्ट झाला आहे.

याबाबत कारखाना प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही नहरात दूषित पाणी सोडणे बंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेद्वारे शिवसेना तालुका प्रमुख अनिल सार्वे, मधुकर बुरडे, गोवर्धन मारवाडे, रूपेश झंझाड, विनोद रहांगडाले यांनी दिला आहे.

बॉक्स

कारखान्याचे पाणी नहरात

कारखान्याचे दूषित पाणी नहरात कोणत्या नियमाद्वारे सोडले जात आहे, ज्यामुळे घनश्याम हिंगे देव्हाडा, मोहगाव (करडी) येथील ज्ञानी बुरडे, आत्माराम पडोळे, मिली गोंडाने, सुशील हिंगे, शालिक उके, आदी शेतकरी केमिकलयुक्त पाण्याने त्रस्त आहेत. त्यांचे संपूर्ण पीक खराब झाले असल्याने कारखाना प्रशासनासोबत चोराखमारा जलाशय विभागाचे शाखा अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.