शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कारखान्यातील दूषित पाणी शिरले शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST

मोहाडी : कारखान्यातील केमिकलमिश्रित पाणी कालव्यात सोडले जात असून, ते पाणी सरळ शेतात जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचे रब्बी पीक ...

मोहाडी : कारखान्यातील केमिकलमिश्रित पाणी कालव्यात सोडले जात असून, ते पाणी सरळ शेतात जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचे रब्बी पीक नष्ट झाले आहे. रसायनयुक्त पाणी त्वरित बंद करण्यात यावे, तसेच शाखा अभियंत्याला निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी मोहाडी तालुका शिवसेनेतर्फे आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता देव्हाडा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे.

देव्हाडा बूज येथील मानस साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून, पूर्ण शक्तीने साखर निर्मिती सुरू आहे. या प्रक्रियेसाठी वापरून झालेले केमिकलयुक्त पाणी ज्यात सल्फर, ॲसिड, गंधक, चुना असतो, असे घाणयुक्त पाणी चोरखमारा नहरात सोडले जात आहे. नहराच्या माध्यमातून हे विषयुक्त निळ्या रंगाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने गहू, हरभरा, लाखोळी, जवस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हिरामण शेंडे यांचा गहू पूर्ण नष्ट झाला आहे.

याबाबत कारखाना प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही नहरात दूषित पाणी सोडणे बंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेद्वारे शिवसेना तालुका प्रमुख अनिल सार्वे, मधुकर बुरडे, गोवर्धन मारवाडे, रूपेश झंझाड, विनोद रहांगडाले यांनी दिला आहे.

बॉक्स

कारखान्याचे पाणी नहरात

कारखान्याचे दूषित पाणी नहरात कोणत्या नियमाद्वारे सोडले जात आहे, ज्यामुळे घनश्याम हिंगे देव्हाडा, मोहगाव (करडी) येथील ज्ञानी बुरडे, आत्माराम पडोळे, मिली गोंडाने, सुशील हिंगे, शालिक उके, आदी शेतकरी केमिकलयुक्त पाण्याने त्रस्त आहेत. त्यांचे संपूर्ण पीक खराब झाले असल्याने कारखाना प्रशासनासोबत चोराखमारा जलाशय विभागाचे शाखा अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.