शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुलामुळे तुटतो शेतकऱ्यांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:55 IST

भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देदोन जिल्ह्याच्या सीमेत अडकले पूलाचे काम : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकटात सापडली आहे.गोंडउमरी, पिपरी ते सौंदड या मार्गावर एक नाला आहे. हा नाला गोंडउमरीला लागून आहे. या नाल्यावर एक लहानपूल असून त्याची दहा वर्षापुर्वी मोडतोड झाली आहे. या क्षतीग्रस्त पूलाची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत येणाºया गोंडउमरी व परिसरातील इतर गावात वास्तव्यास असणाºया शेतकºयांची शेती पुलाच्या त्या भागाला म्हणजेच गोंदिया जिल्ह्यात येते. जवळपास २०० एकर शेती असुन खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकºयांना पूल ओलांडून जावे लागते. परंतू पहिल्याच पावसात या पुलाची स्थिती अंत्यत बिकट झाली आहे. नाल्यामुळे पूल पोखरला असून सर्वत्र पाणी साचले आहे. या पुलावरुन बैलबंडी, ट्रॅक्टर अशी वाहने शेतावर नेणे अडचणीचे झाले आहे. मशागत, पेरणी, रोवणी व इतर कामे करण्यासाठी कोणतेही वाहन नेता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. प्रसंगी दमदार पावसामुळे नाला ओलाडणाऱ्या शेतकऱ्यांना दुर्घटनेचा बळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान सडक, मुख्यमंत्री सडक योजना अशा योजनेतून या पुलासाठी राहत निधी उपलब्ध होऊ शकते. मात्र राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्याने या पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगण्याशिवाय शेतकºयांना उपाय नाही.