शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुलामुळे तुटतो शेतकऱ्यांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:55 IST

भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देदोन जिल्ह्याच्या सीमेत अडकले पूलाचे काम : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकटात सापडली आहे.गोंडउमरी, पिपरी ते सौंदड या मार्गावर एक नाला आहे. हा नाला गोंडउमरीला लागून आहे. या नाल्यावर एक लहानपूल असून त्याची दहा वर्षापुर्वी मोडतोड झाली आहे. या क्षतीग्रस्त पूलाची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत येणाºया गोंडउमरी व परिसरातील इतर गावात वास्तव्यास असणाºया शेतकºयांची शेती पुलाच्या त्या भागाला म्हणजेच गोंदिया जिल्ह्यात येते. जवळपास २०० एकर शेती असुन खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकºयांना पूल ओलांडून जावे लागते. परंतू पहिल्याच पावसात या पुलाची स्थिती अंत्यत बिकट झाली आहे. नाल्यामुळे पूल पोखरला असून सर्वत्र पाणी साचले आहे. या पुलावरुन बैलबंडी, ट्रॅक्टर अशी वाहने शेतावर नेणे अडचणीचे झाले आहे. मशागत, पेरणी, रोवणी व इतर कामे करण्यासाठी कोणतेही वाहन नेता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. प्रसंगी दमदार पावसामुळे नाला ओलाडणाऱ्या शेतकऱ्यांना दुर्घटनेचा बळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान सडक, मुख्यमंत्री सडक योजना अशा योजनेतून या पुलासाठी राहत निधी उपलब्ध होऊ शकते. मात्र राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्याने या पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगण्याशिवाय शेतकºयांना उपाय नाही.