शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

कान्हळगावात मॉडेल ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम

By admin | Updated: January 13, 2016 00:39 IST

कान्हळगाव ग्रामपंचायतीची ईमारत मोडकळीस आली होती. गावकऱ्यांना बसण्यासाठी, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुध्दा अडचणींचा सामना करावा लागत होता.

जनसुविधेतून मिळाला १२ लाखांचा निधी : ‘नो प्रॉफिट, नो लॉस’ तत्त्वावर बांधकामकरडी (पालोरा) : कान्हळगाव ग्रामपंचायतीची ईमारत मोडकळीस आली होती. गावकऱ्यांना बसण्यासाठी, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुध्दा अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात परिस्थिती गंभीर असायची. सरपंच व सदस्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे निधीची मागणी केली. परंतू १५ वर्षांपासून प्रश्न सुटत नव्हता. अखेर जनसुविधा योजनेतून १२ लाख रूपयांया निधीला मंजूरी मिळाली. ‘नो लॉस, नो प्रॉफीट’ तत्वावर ग्रामपंचायतीची सुसज्ज व अत्याधुनिक सुविधांनी युक्त मॉडेल ईमारतीचे बांधकाम करुन प्ररेणादायी उदाहरण सर्वांसमोर उभे केले आहे.मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव ग्रामपंचायतीच्या मोडकळीस आलेल्या ईमारतीच्या बांधकामासाठी सरपंच गिता रोडके व उपसरपंच दिगांबर कुकडे आणि सदस्यांनी अनेक योजनांचा अभ्यास केला. त्यामध्ये बीआरजीएफ योजनेचाही समावेश होता. मात्र टप्प्याटप्प्याने निधी मिळत असल्याने योजना पटत नव्हती. ग्रामपंचायतीला त्यांच्या मनातील कल्पना साकार करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जनसुविधा योजनेची निवड केली. परंतू या योजनेसाठी डिपीडिसीकडे अनेक ग्रामपंचायतीचे अर्ज होते. निधी मंजुरीसाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य बाबु ठवकर यांनी पुढाकार घेतला. १२ लाखांच्या निधीत अत्याधुनिक सुविधानीयुक्त सुंदर, आकर्षक व सर्वांच्या मनात भरणारी मॉडेल ईमारत तयार करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अभियंता बोरकर यांना साकडे घातले. मनाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करवून घेतला.कामाच्या आराखड्यात मनातील कल्पनांना मुर्त रुप देण्यात आले. कामाचे कंत्राट ग्राम पंचायतीने स्वत:कडे ठेवले. नो लॉस, नो प्राफिट तत्वावर बांधकाम करण्यास सुरुवात झाली. कल्पनेप्रमाणे बांधकामासाठी गावातील गवंडी काम करणाऱ्या तरुणाला काम देण्यात आले. अंदाजपत्रकात नमुद नसलेली अनेक कामे उरकुन घेण्यात आली. आतील कामाबरोबर बाहेरिल भागाचे काम आकर्षक पध्दतीने करण्यात आले. त्यातून एक देखनी इमारत आकाराला आली. ग्राम पंचायत इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी आमदार चरण वाघमारे यांनी निधी दिला असून बांधकाम सुरु आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला पर्यावरण रत्न पुरस्काराचा निधी बगीच्याच्या उभारणीसाठी राखून ठेवलेला असून त्यातून बगीच्याची उभारणी होणार असल्यची माहिती आहे. कान्हळगाव हे १२०० लोकवस्तीचे गाव असून ग्रामपंचायतीला हागणदारी मुक्त ग्राम, पर्यावरण रत्न ग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, १०० टक्के कर वसुली आदी पुरस्कार मिळालेले असून त्या निधीतून अनेक विकासाची कामे करण्यात आली आहेत. (वार्ताहर)