शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कारली वितरिकेचे बांधकाम अर्धवट

By admin | Updated: June 13, 2016 02:05 IST

तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली येथे सन २००६-१७ या कालावधीत वितरिकेचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र हे बांधकाम मध्यंतरीच रखडले.

पवनारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली येथे सन २००६-१७ या कालावधीत वितरिकेचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र हे बांधकाम मध्यंतरीच रखडले. त्यामुळे परिसरातील कारली, गर्रा, आसलपाणी, मोहगाव, जोगेवाडा, चिचोली, भोंडकी, मोखेटोला येथील शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यामुळे वंचित राहावे लागले. त्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.बावनथडी प्रकल्पाचा उजवा कालव्यावरील कारली वितरिकेचे काम सन २००६-०७ कालावधीत सुरु झाले. परंतु बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचू शकले नाही. या वितरिकेवर गर्रा ३९३.५० एकर, कारली ८३०.५० एकर, आसलपाणी ४५६ एकर, चिचोली १,००२.८७ एकर, भोंडकी ५५१.४० एकर, मोठागाव २०५.९७ एकर, जोगेवाडा १४८.९२ एकर शेतजमीन आहे. शासनाला महसूल पाठविण्याकरिता शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो. मात्र पाणी मिळत नाही. याबाबत अनेकदा तक्रार दिली. कुणीही पुढाकार घेतला नाही. प्रशासन किती सुस्त आहे असे म्हणायला हरकत नाही. जंगलव्याप्त भागात वसलेला कारली गावात ९० टक्के आदिवासी बांधव आहेत. शासनाच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे दुष्काळामुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे. याबाबत बावनथडी प्रकल्प सिंचन विभाग व लोकप्रतिनिधी यांना ही बाब अनेकदा लक्षात आणून दिली तरी कुणीही लक्ष दिले नाही. केवळ आश्वासन देण्यात आले. येथील शेतकऱ्याचा मुख्य भात पिक असून यावर्षी देखील पिकाची लागवड करण्यात येईल तरी कारली वितरिकेचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन व्हावे अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे. (वार्ताहर)