शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रोहयो योजनेतील पुलाचे बांधकाम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:17 IST

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी ...

ठळक मुद्देपाईप खरेदीवरही खर्च : अन्य कामाचा थांगपत्ता नाही, चांदपूर येथील प्रकार

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी वर तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने डल्ला मारले असतांना पुन्हा पांदन रस्त्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावात सन २०१६ सत्रात डी.पी. ते आंब्याचे झाडपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत पांदन रस्त्याचे कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे कामे करण्यासाठी ३ लाख ५३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पांदन रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम करण्यात आले असले तरी बाळा फडणवीस यांचे शेत शिवार नजिक पुलाचे बांधकाम करतांना फक्त पाईप घालण्यात आले आहे. या पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. पांदन रस्त्याचे प्राप्त निधीची उचल करण्यात आली आहे. यात १ लाख २५ हजार रुपयांचा निधी असुन ५ हजार रुपयाचे मस्टर काढण्यात आले आहे. दरम्यान तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने अर्धवट कार्य ठेवल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.या पांदन रस्त्यावर मुरुमाचा थांगपत्ता नाही. फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याने गावकऱ्यांच्या भुवय्या उंचाविल्या आहे. या गावात शेतकऱ्यांचे योजनांचा बोजवारा वाजविण्यात आला असल्याने न्याय देतांना अडचणी येत आहेत. तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाचा फटका विद्यमान प्रशासनाला बसत आहे. लाभार्थ्यांचे याच प्रशासनावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. ज्या गैरव्यवहारात या प्रशासनाची भुमिका नाही. यामुळे खोट्या आरोपाची जबाबदारी स्विकारण्यात येणार नाही. अशी भुमिका ग्राम पंचायत प्रशासनाने घेतली आहे. यामुळे गावात रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाची चौकशी करुन दोषी पदाधिकारी तथा कर्मचारी विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.पांदण रस्त्याचे पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. रोहयो योजनेची चौकशी झाली पाहिजे.- उर्मिला लांजे,सरपंच चांदपूर