शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

१६०० घरकुलांचे बांधकाम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

लाखांदूर तालुक्यात २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार ८४ घरकुलांचे उद्दिष्ट येथील पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास चार हजार ३८५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली होती. सदर मंजुरी अंतर्गत जवळपास २४८९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असताना आहेत.

ठळक मुद्देलाखांदूर तालुका : तीन वर्षांपासून प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विविध आवास योजनेंतर्गत लाखांदूर तालुक्यासाठी मंजूर झालेल्या घरकुलांपैकी तब्बल १६०० घरांचे बांधकाम अपूर्ण आहे. पावसाळ्यापूर्वी हक्काच्या घरकुलात जाण्याचे अनेकांचे स्वप्न यामुळे भंगले आहे. तर सुमारे ९० लाभार्थ्यांनी आतापर्यंत करारनामे केले नसल्याचे पुढे आले आहे.लाखांदूर तालुक्यात २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार ८४ घरकुलांचे उद्दिष्ट येथील पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास चार हजार ३८५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली होती. सदर मंजुरी अंतर्गत जवळपास २४८९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असताना आहेत. मात्र १६०० घरकुलांचे बांधकाम अपुर्णच आहेत. ९० घरकुल लाभार्थ्यांचे अद्यापही करारनामे झाले नाहीत. या संबंधाने अधिक माहिती घेतली असता या योजनेतील काही लाभार्थ्यांनी हेतूपुरस्पर बांधकाम न करता निधीची उचल केल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र पंचायत समिती स्तरावरून लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी उपलब्ध होत असताना ग्रामसेवक व अभियंत्यांनी या सबंध प्रकाराकडे डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.शासनाच्या रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेले घर आपल्याला लवकरच मिळेल, अशी अनेकांची आशा होती. घरकुलासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव लाभार्थ्यांनी केली. मात्र अद्यापही १६०० लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. पावसाळ्यापूर्वी हक्काच्या घरकुलात जाण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. आपल्या पडक्या घरातच राहण्याची वेळ त्यांच्यावर आली तर काही बेघरांना यामुळे उघड्यावर राहण्याशिवाय पर्याय नाही.अंमलबजावणी केव्हा होणार?गोरगरीब जनतेच्या निवासी सोयी सुविधेसाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी घरकूल योजनेच्या लाभासाठी खर्च केला जातो. मात्र लाभार्थी व प्रशासकीय यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षासह उदासीन धोरणामुळे या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रमाणात होत नसल्याचे दिसते. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन घरकुल योजनेच्या अंमलबजावणीविषयी उदासीनता दाखविणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना