शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

१६०० घरकुलांचे बांधकाम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

लाखांदूर तालुक्यात २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार ८४ घरकुलांचे उद्दिष्ट येथील पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास चार हजार ३८५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली होती. सदर मंजुरी अंतर्गत जवळपास २४८९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असताना आहेत.

ठळक मुद्देलाखांदूर तालुका : तीन वर्षांपासून प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विविध आवास योजनेंतर्गत लाखांदूर तालुक्यासाठी मंजूर झालेल्या घरकुलांपैकी तब्बल १६०० घरांचे बांधकाम अपूर्ण आहे. पावसाळ्यापूर्वी हक्काच्या घरकुलात जाण्याचे अनेकांचे स्वप्न यामुळे भंगले आहे. तर सुमारे ९० लाभार्थ्यांनी आतापर्यंत करारनामे केले नसल्याचे पुढे आले आहे.लाखांदूर तालुक्यात २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार ८४ घरकुलांचे उद्दिष्ट येथील पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास चार हजार ३८५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली होती. सदर मंजुरी अंतर्गत जवळपास २४८९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असताना आहेत. मात्र १६०० घरकुलांचे बांधकाम अपुर्णच आहेत. ९० घरकुल लाभार्थ्यांचे अद्यापही करारनामे झाले नाहीत. या संबंधाने अधिक माहिती घेतली असता या योजनेतील काही लाभार्थ्यांनी हेतूपुरस्पर बांधकाम न करता निधीची उचल केल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र पंचायत समिती स्तरावरून लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी उपलब्ध होत असताना ग्रामसेवक व अभियंत्यांनी या सबंध प्रकाराकडे डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.शासनाच्या रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेले घर आपल्याला लवकरच मिळेल, अशी अनेकांची आशा होती. घरकुलासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव लाभार्थ्यांनी केली. मात्र अद्यापही १६०० लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. पावसाळ्यापूर्वी हक्काच्या घरकुलात जाण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. आपल्या पडक्या घरातच राहण्याची वेळ त्यांच्यावर आली तर काही बेघरांना यामुळे उघड्यावर राहण्याशिवाय पर्याय नाही.अंमलबजावणी केव्हा होणार?गोरगरीब जनतेच्या निवासी सोयी सुविधेसाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी घरकूल योजनेच्या लाभासाठी खर्च केला जातो. मात्र लाभार्थी व प्रशासकीय यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षासह उदासीन धोरणामुळे या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रमाणात होत नसल्याचे दिसते. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन घरकुल योजनेच्या अंमलबजावणीविषयी उदासीनता दाखविणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना