शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

राज्यघटना देशाचा सर्वाेच्च ग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:17 IST

भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देन्यायमूर्ती व्ही. एस. देशमुख : राज्यघटना उद्देशिका अनावरण

आॅनलाईन लोकमतभंडारा : भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.भारतीय घटनेची प्रस्तावना, उद्देशिका जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली, त्या अनावरणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वकील संघ भंडाराचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास भुरे, बार कॉन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदिपे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. व्ही. बी. भोले, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक डी.व्ही. देशमुख, भंडारा जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड. राजकुमार उके, जिल्ह्यातील न्यायाशीध, वकील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.न्या. देशपांडे यांनी, भारतीय घटनेची प्रस्तावना भारतीय नागरिकांना कर्तव्य पालन काय व कसे करावे हे सांगते. त्यातील शब्दांना जिवंतपणा आणण्याचे कर्तव्य आपणा सर्वांचे आहे. उद्देशिका आपणच मुर्तीमंत स्वरूपात कृतीत आणायची आहे. त्यातून पळवाट काढता येणार नाही. हे काम केवळ न्याय संस्थेचे नाही. त्यासाठी स्वत:ला बदलवावे लागेल. स्त्रियांना न्याय वागणूक द्यावी. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी भंडाऱ्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी, राज्यघटना देशाची जीवनवाहीनी आहे. याचे पालकत्व न्यायपालिकेकडे आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण व कायद्याचे राज्य हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य हेतू आहेत. भारताची विविधता म्हणजे संस्कृती, भाषा, वंश, प्रांत, धर्म आणि जाती यांना एकत्र आणण्याच्या हेतुने नमूद केले आहेत. भारतीय घटना ही विषमता नष्ट करणारा केवळ कायदा नसून इतर कायदे करण्याचे अधिकार देणारी यंत्रणा सुद्धा आहे. त्यामध्ये बोलणे, वागणे, विचार व्यक्त करणे इत्यादीचे नागरिकांना मर्यादित स्वातंत्र्य दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.संचालन अ‍ॅड. शशीर वंजारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रबंधक डी.व्ही. देशमुख यांनी मानले.