शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना देशाचा सर्वाेच्च ग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:17 IST

भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देन्यायमूर्ती व्ही. एस. देशमुख : राज्यघटना उद्देशिका अनावरण

आॅनलाईन लोकमतभंडारा : भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.भारतीय घटनेची प्रस्तावना, उद्देशिका जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली, त्या अनावरणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वकील संघ भंडाराचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास भुरे, बार कॉन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदिपे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. व्ही. बी. भोले, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक डी.व्ही. देशमुख, भंडारा जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड. राजकुमार उके, जिल्ह्यातील न्यायाशीध, वकील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.न्या. देशपांडे यांनी, भारतीय घटनेची प्रस्तावना भारतीय नागरिकांना कर्तव्य पालन काय व कसे करावे हे सांगते. त्यातील शब्दांना जिवंतपणा आणण्याचे कर्तव्य आपणा सर्वांचे आहे. उद्देशिका आपणच मुर्तीमंत स्वरूपात कृतीत आणायची आहे. त्यातून पळवाट काढता येणार नाही. हे काम केवळ न्याय संस्थेचे नाही. त्यासाठी स्वत:ला बदलवावे लागेल. स्त्रियांना न्याय वागणूक द्यावी. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी भंडाऱ्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी, राज्यघटना देशाची जीवनवाहीनी आहे. याचे पालकत्व न्यायपालिकेकडे आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण व कायद्याचे राज्य हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य हेतू आहेत. भारताची विविधता म्हणजे संस्कृती, भाषा, वंश, प्रांत, धर्म आणि जाती यांना एकत्र आणण्याच्या हेतुने नमूद केले आहेत. भारतीय घटना ही विषमता नष्ट करणारा केवळ कायदा नसून इतर कायदे करण्याचे अधिकार देणारी यंत्रणा सुद्धा आहे. त्यामध्ये बोलणे, वागणे, विचार व्यक्त करणे इत्यादीचे नागरिकांना मर्यादित स्वातंत्र्य दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.संचालन अ‍ॅड. शशीर वंजारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रबंधक डी.व्ही. देशमुख यांनी मानले.