शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

स्वेच्छा अनुदानासाठी एकवटले खापरीवासीय

By admin | Updated: April 27, 2016 00:26 IST

पंचायतराज धोरणानुसार ग्रामसभेला महत्व प्राप्त झालेले असून गाव करी ते राव न करी याचा प्रत्यय खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनासंदर्भात घेण्यात आलेल्या...

७० कुटुंबांनी घेतला निर्णय : विशेष ग्रामसभेत झाला ठरावअशोक पारधी पवनीपंचायतराज धोरणानुसार ग्रामसभेला महत्व प्राप्त झालेले असून गाव करी ते राव न करी याचा प्रत्यय खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनासंदर्भात घेण्यात आलेल्या ग्रामसभेने दाखवून दिले. स्वेच्छा पुनर्वसनासाठी सभाच घ्यायची नाही अशी भूमिका असताना नागरिकांच्या मागणीनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ५०० च्या पुढे उपस्थिती असलेल्या विशेष सभेत ७० टक्के कुटुंबांनी स्वेच्छा पुनर्वसनाचे बाजूने तर ३० टक्के कुटुंबांनी गावठाणच्या बाजूने मतदान केले.गोसीखुर्द प्रकल्पामुळे खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनाचा मुद्दा गेली कित्येक वर्षे नोकरशाहीत अडून राहिला. त्या गावाला पाहिजे तेवढी जमीन प्रकल्पाचा पुनर्वसन विभाग उपलब्ध करून देवू शकला नाही. गोसीखुर्द प्रकल्प व त्याहीपेक्षा जास्त त्रास उमरेड, कऱ्हांडला, पवनी अभयाण्यातील हिंस्त्र प्राण्यांपासून नागरिकांना होवू लागला होता. कित्येक कुटुंबांनी स्वत:चे कुटुंब नाईलाजाने स्थलांतरीत केलेले होते. अशा परिस्थितीत लोकांची मागणी विचारात घेणे गरजेचे होते. त्यामुळे ग्रामसभेशिवाय पर्याय उरलेला नव्हता. अखेर सोमवारला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. कधी नव्हे एवढी उपस्थिती ग्रामसभेला होती. दिवसभर पाच ते सहा तास ग्रामसभा चालली. सुरुवातीला ग्रामसभेचे अध्यक्ष महणून सुनिल श्रीहरी ढोणे यांची आवजी मतदानाने निवड झाल्यानंतर सभा सुरु झाली. खापरी (रेहपाडे) गावाला स्वेच्छा अनुदान की भूखंड या एकमेव विषयावर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेच्या सदस्यांचे मतदान घेण्यात आले. तेव्हा ७० टक्के लोकांनी स्वेच्छा अनुदान पाहिजे या बाजूने मतदान केले ३० टक्के लोकांनी भूखंड पाहिजे या बाजूने मतदान केले. ७० टक्के व ८० टक्के लोकांनी स्वेच्छा अनुदान की भूखंड पाहिजे ते नमुना अर्ज भरून दोन किंवा तीन दिवसात ग्रामपंचायत कार्यालयाकडे सादर करावे असे ठरावात नमूद करण्यात आले. पवनी तालुक्यात पहिल्यांदाच अशा विषयावर सभा घेण्यात आल्याने बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक मधुकर गीते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व अन्य सदस्य सुद्धा उपस्थित होते. ग्रामसेवक काटेखाये यांनी विशेष ग्रामसभेचा ठराव वाचून दाखविला व सभेचा समारोप झाला.