शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

प्रादेशिक जंगलातील प्राण्यांसाठी संवर्धनाचा आराखडा गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST

नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मध्य भारतातील हा महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून, कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडतो. दुसरीकडे, उमरेड-पवनी-कऱ्हांडला हा अभयारण्य आहे. वन्यजीव विभागाचे हे जंगल सोडले तर जिल्ह्यातील प्रादेशिक जंगलांमध्येही वाघ, बिबट्यासह वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात चौफेर पसरलेल्या वन आणि वन्यप्राण्यांमुळे या प्रदेशात विकासाची नांदी आहे; परंतु वन्यजीव विभागाकडे व्याघ्र संवर्धन आराखडा असला तरी प्रादेशिक जंगलातील प्राण्यांसाठी संवर्धनाचा आराखडाच नसल्याने वन्यप्राण्यांचे बळी जाणे नित्याचेच झाले आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात वर्षभरात सहा वाघ आणि चार बिबट्यांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याची बाब अधिक स्पष्ट झाली आहे.नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मध्य भारतातील हा महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून, कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडतो. दुसरीकडे, उमरेड-पवनी-कऱ्हांडला हा अभयारण्य आहे. वन्यजीव विभागाचे हे जंगल सोडले तर जिल्ह्यातील प्रादेशिक जंगलांमध्येही वाघ, बिबट्यासह वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. प्रादेशिक जंगलांमध्ये वन्यजीवांचा प्रचंड भार असताना त्यांच्या संवर्धनासाठी अद्यापही ठोस पाऊल उचलले गेले नाही.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी पवनी तालुक्यातील कलेवाडा येथे विहिरीत दोन बिबट्या मृतावस्थेत आढळून आले. १२ मे २०२१ रोजी भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गराडा बु. या गावाशेजारी एका सायफन विहिरीत वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत सापडले. आपल्या बछड्यांच्या शोधासाठी वाघीण सतत त्या सायफन विहिरीकडे येत होती. याच दिवशी पवनी तालुक्यातील धानोरी या गावात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. तर रावणवाडी जंगलात अस्वलाचा शव सापडला. एकाच दिवशी वाघाचे तीन बछडे आणि एका अस्वलाच्या मृत्यूने वन विभाग हादरले होते. त्यानंतर यावर्षी २९ जानेवारीला भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माथाडी परिसरात बी २ या वाघाची विद्युत प्रवाह सोडून शिकार करण्यात आली. त्यानंतर ५ फेब्रुवारीला पवनी तालुक्यातील पिंपळगाव/निपानी येथे बिबट्या, कोल्ह्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. ३१ मार्च रोजी तुमसर तालुक्यातील बपेरा येथे अवयस्क वाघाची शिकार करण्यात आली. तर ४ एप्रिल रोजी उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा शव सापडला. यातील उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना सोडली तर, उर्वरित सर्व घटना प्रादेशिक जंगलात घडलेल्या आहेत. तरीसुद्धा प्रादेशिक जंगलातील व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न केले गेलेले नाहीत. याकडे आता वनविभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

प्रादेशिक जंगलातील व्याघ्र संवर्धनासाठी नवीन धोरण तयार करण्याची गरज आहे. याशिवाय प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण, संसाधनाची उपलब्धता, वन्यजीव व्यवस्थापनाचे धडे दिल्यास वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांच्या मृत्यूवर नियंत्रण मिळविता येऊ शकेल.-नदीम खान, मानद वन्यजीव रक्षक, भंडारा. 

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग