शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

निसर्गाचे संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST

भंडारा : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वतोपरी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी केले. इंदुताई ...

भंडारा : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वतोपरी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी केले. इंदुताई मेमोरियल हायस्कूल तथा कनिष्ठ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय हरदोली येथे जागतिक निसर्ग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्राचार्य ओ.बी. चोले यांच्या अध्यक्षतेत, प्रमुख पाहुणे म्हणून खेमचंद हटवार, अनाथ पाल, वैद्य जे.आर. राऊत, त्रिशरण मेश्राम, संजय जांभूळकर, गोपाल घोती, प्रतीक राठोड, प्रा. एम.एम. सिंगनजुडे, प्रा. झोडे, नरेश चव्हाण, माधुरी मेश्राम, किशोर शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य चोले म्हणाले, निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्षे लागतात, तरीपण मानव विकासाच्या नावाखाली आपल्या सुखसोयीसाठी या निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचा वारेमाप उपयोग करत असल्याने ही संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मानवामध्ये आधुनिक व सुखासीन जीवनशैली रुजू लागली असून मानव आपल्या सुखासाठी निसर्गातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारेमाप उपयोग करत असल्याने एकेकाळी घनदाट असलेली जंगले ओसाड पडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खनिज संपत्तीचा अनावश्यक वापर करण्यात येत असून यामुळे पर्यावरण प्रदूषित होत असल्याने सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत असून अनेक दुर्धर आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे सजीव सृष्टीचे जीवन संकटात आले आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्याचा कृती संकल्प करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी कार्यक्रमप्रसंगी केले. संचालन खेमचंद हटवार, तर आभार प्रा. सिंगनजुडे यांनी मानले.