शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीच्या पोतावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 21:55 IST

जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : सिहोरा येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.सिहोरा येथील बाजार चौक परिसरात आयोजित कायदेविषयक, सेंद्रीय शेती, रासायनिक खत आणि दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश न्या. संजय देशमुख होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव कोठारी, डॉ. संजय एकापुरे (गणेशपूर), अ‍ॅड. प्रशांत मेश्राम, रडार शेतकरी उत्पादकचे संचालक अभय ठेंगे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, वाहनी येथील सरपंच गडीराम बांडेबुचे, केंद्रीय नोटरी अ‍ॅड. विजय पारधी, पेसेज कॅरिअर बेस्ट डील कंपनीचे संचालक गौरीशंकर डोहके, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक ओमकार तुरकर, शेखर तिवारी, संतोष गाढवे, जयशंकर घटारे, कलीम शेख, चंद्रशेखर डोहळे, राकेश मिश्रा, नरेश ढोमणे उपस्थित होते.सिहोरा परिसरातील ४७ गावात असणाऱ्या शेतकऱ्यांना जैविक आणि सेंद्रिय शेतीमुळे विषयी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या शिवाय शेतकऱ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.शिबिराचे आयोजन करण्यात आले असता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. या मेळाव्यात शेतकऱ्यांना रासायनिक खतामुळे जमिनीतील पोत आणि जैविक घटक नष्ठ होत असल्याची माहिती देण्यात आली.यामुळे उत्पादनात निरंतर घट होत आहे. याशिवाय शेतीवर दुष्परिणाम होत असल्याचे उपस्थित असलेल्या मार्गदर्शक अतिथींनी यावेळी आर्वजून सांगितले. दरवर्षी सातत्याने शेती उत्पादनात घट अनुभवणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व अनुमती तज्ज्ञांना सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जयशंकर घटारे यांनी केले.