शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीच्या पोतावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 21:55 IST

जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : सिहोरा येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.सिहोरा येथील बाजार चौक परिसरात आयोजित कायदेविषयक, सेंद्रीय शेती, रासायनिक खत आणि दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश न्या. संजय देशमुख होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव कोठारी, डॉ. संजय एकापुरे (गणेशपूर), अ‍ॅड. प्रशांत मेश्राम, रडार शेतकरी उत्पादकचे संचालक अभय ठेंगे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, वाहनी येथील सरपंच गडीराम बांडेबुचे, केंद्रीय नोटरी अ‍ॅड. विजय पारधी, पेसेज कॅरिअर बेस्ट डील कंपनीचे संचालक गौरीशंकर डोहके, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक ओमकार तुरकर, शेखर तिवारी, संतोष गाढवे, जयशंकर घटारे, कलीम शेख, चंद्रशेखर डोहळे, राकेश मिश्रा, नरेश ढोमणे उपस्थित होते.सिहोरा परिसरातील ४७ गावात असणाऱ्या शेतकऱ्यांना जैविक आणि सेंद्रिय शेतीमुळे विषयी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या शिवाय शेतकऱ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.शिबिराचे आयोजन करण्यात आले असता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. या मेळाव्यात शेतकऱ्यांना रासायनिक खतामुळे जमिनीतील पोत आणि जैविक घटक नष्ठ होत असल्याची माहिती देण्यात आली.यामुळे उत्पादनात निरंतर घट होत आहे. याशिवाय शेतीवर दुष्परिणाम होत असल्याचे उपस्थित असलेल्या मार्गदर्शक अतिथींनी यावेळी आर्वजून सांगितले. दरवर्षी सातत्याने शेती उत्पादनात घट अनुभवणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व अनुमती तज्ज्ञांना सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जयशंकर घटारे यांनी केले.