शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसचा पायदळ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:18 IST

पुंडलिक हिवसे ।आॅनलाईन लोकमतखरबी (नाका) : भाजप सरकारने मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे लहान व्यापारी व शेतकरी अडचणीत आला आहे. जाचक अटी लादून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचे महापाप या सरकारने केले. हे सरकार शेतकऱ्यांसाठी मारक ...

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मारक

पुंडलिक हिवसे ।आॅनलाईन लोकमतखरबी (नाका) : भाजप सरकारने मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे लहान व्यापारी व शेतकरी अडचणीत आला आहे. जाचक अटी लादून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचे महापाप या सरकारने केले. हे सरकार शेतकऱ्यांसाठी मारक असल्याचा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी खरबी ते नागपूर असा माजी आमदार सेवक वाघाये पाटील यांच्या नेतृत्त्वात जनआक्रोश पायदळ मोर्चा खरबी येथून काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रफुल गुडधेपाटील, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, जि.प.अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, महासचिव झिया पटेल, सरोज सेवक वाघाये, सभापती विनायक बुरडे, अ‍ॅड.शशीर वंजारी मंचावर उपस्थित होते.यावेळी प्रफुल गुडधे पाटील म्हणाले, भंडारा जिल्हा हा सधन जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु मागील दोन वर्षात या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे या सरकारला आता खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही.यावेळी मोर्चाचे आयोजक सेवक वाघाये म्हणाले, माझ्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. माझ्याकडे ५० एकर शेती असून पाण्याअभावी व तुडतुड्या, करपामुळे खंडीभर धान झाले नाही. ५० एकरातील धान पेटवून टाकले. माझ्यावर असा आघात झाला असेल तर माझ्या शेतकऱ्यांची परिस्थिती कशी असेल ही जाणीव झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढा देण्याचे ठरविले व आज विधानभवनावर पायदळ मोर्चा काढत असल्याचे सांगितले.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहभागी असलेला हा मोर्चा दुपारी २ वाजता नागपूरच्या दिशेने कूच केला. सायंकाळी ६ वाजता वडोदा येथे विश्रांतीनंतर मंगळवारला सकाळी ६ वाजता ही पदयात्रा नागपूररकडे निघणार आहे. सभेचे संचालन झिया पटेल व राजकपूर राऊत यांनी तर आयोजन जि.प. सदस्य प्रेम वनवे व खराडीचे सरपंच संजय हिवसे यांनी केले. या मोर्चात जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, तालुका अध्यक्ष, नगरसेवक भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.या आहेत मोर्चेकऱ्यांच्या मागण्यानैसर्गिक आपत्तीमुळे धानपीक नष्ट झालेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे. त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, जाचक अटी शिथिल करून सरसकट पीक विमा देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा. ओबीसीची नॉनक्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी. कृषीपंपाचे वाढीव बिल कमी करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, धानाचे दर वाढवून दिले पाहिजे. तुडतुडा व किडीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे. शेतकºयांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी विधानभवनावर हा पायदळ मोर्चा आहे.- माणिकराव ठाकरे,उपसभापती, विधान परिषद.