शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुकळी येथे काँग्रेसची चिंतन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:03 IST

कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेकडे अधिक लक्ष देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य पोहचविण्याचे काम करणे गरजेचे आहे, असे विचार साकोली तालुक्यातील सुकळी येथे रविवारी दुपारी जिल्हा काँग्रेस कमेटीची चिंतन सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआगामी विधानसभा निवडणुकीवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेकडे अधिक लक्ष देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य पोहचविण्याचे काम करणे गरजेचे आहे, असे विचार साकोली तालुक्यातील सुकळी येथे रविवारी दुपारी जिल्हा काँग्रेस कमेटीची चिंतन सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.याप्रसंगी माजी खासदार नाना पटोले म्हणाले, काँग्रेस हा गोरगरीब जनता, शेतकरी व कामगारांचा पक्ष असून मतदान प्रक्रियेतील हार जीत ही चालूच राहते, परंतु आमची लढाई ही सर्वसामान्यांसाठीची लढाई असून ती सुरुच राहणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचाच झेंडा विधानसभेवर फडकेल असा ठाम विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.पटोले यांनी कार्यकर्त्यांना पराजयाला घाबरून न जाता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने कामाला सुरुवात करण्यास सांगितले. पुन्हा एकदा सत्तेचा दावा करणाºया भाजप शिवसेना युतीला उत्तर देण्यासाठी सज्ज राहा, असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले, भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भुरे, आरोग्य सभापती प्रेम वनवे, सभापती रेखाताई वासनिक, माजी सभापती पांडे, प्रकाश पचारे, सभापती बंडू ढेंगे, लाखनीचे सभापती खुशाल गिदमारे, माणिकराव ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, प्यारेलाल वाघमारे, अशोक कापगते, माजी सभापती नीळकंठ टेकाम, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, हंसाताई खोब्रागडे, प्रभू मोहतुरे, शंकर राऊत, अमर रगडे, शंकर तेलमासरे, साकोली शहर अध्यक्ष अश्विन नशिने, भूमेश्वर महावाडे, नंदकिशोर समरीत, साकोली तालुका अध्यक्ष विशाल तिरपुडे, सुनील गिºहेपुंजे, मनोहर उरकुडकर, रणभीर कैलाश भगत, सुरेश मेश्राम, धनंजय तिरपुडे, धनराज साठवणे, दिलीप सुरकर, अजय गडकरी, मकसुद पटेल, मुकुंद साखरकर, मंगेश निखाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.सभेत अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सर्वानुमते राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे, असा ठराव जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी मांडला. त्यावेळी सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.संचालन मार्कंड भेंडारकर यांनी केले. यावेळी सभेसाठी जिल्ह्यातून, तालुक्यातून अनेक पदाधिकारी उपस्थित राहिले. सभेला नूतन भोले, संतोष कापसे, गणेश लिमजे, छाया पटेल, वेंदांता गंगभोज, करुणा धुर्वे, नैनश्री येळणे, लता मालाधारी, सीमा बडवाईक, वर्षा बारई, अंजिरा चुटे, करुणा वालोदे, मनीषा भांडारकर, प्रिया खंडाते, शमीम पठाण, भरत लिमजे, भावना शेंडे, निर्मला कापगते, मीरा उरकुडकर, कुंदा वैद्य, कुंदना वाढई, आनंद बिसेन, कान्हा बावनकर, मनोहर भिवगडे, सुनील सिडाम, खुशाल पुस्तोडे, प्रकाश बागडे, जयपाल जनबंखू, लखनलाल चौरे, ओमकार कापगते, मनोहर डोंगरे, उत्तम भागडकर, योगीराज भेंडारकर, ओमप्रकाश गायकवाड, विनायक देशमुख, प्रकाश प्कुरंजेकर, वंदना मेश्राम, आनंदराव पिल्लारे, छबीलाल वासनिक, उमेश कठाणे, राजेश हटवार, विकास भुरे, मनोज देशमुख, अझहर पाशा, आजीम खान, प्रशांत कापगते, जीवन भजनकर, डॉ.चंद्रकांत निंबार्ते,प्रकाश वाघाये, कैलाश, नरेश करंजेकर, अरुण गुजर, दीपक मेंढे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.