शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

काँग्रेस करणार कर्जमाफीचे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:25 IST

मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : यवतमाळ येथून २८ जूनपासून आंदोलनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेचा वर्षश्राद्ध करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाला प्रारंभ करण्यात येत आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पटोले म्हणाले, सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची रूपरेखा आखली आहे. याची सुरुवात यवतमाळ येथून गुरूवारपासून होत आहे. १ जुलै रोजी अकोला, २ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील शहापूर असे येत्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.मागील चार वर्षाच्या कार्यकाळात जिथे दुष्काळ पडला तिथे मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. परंतु शेतकऱ्यांना मदत दिली नाही. त्या शेतकºयांना सरसकट मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची तारीख ३० जूनपर्यंत वाढविली असून हे सरकार समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.पत्रपरिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती प्रेमदास वनवे, जि.प. सदस्य आकाश कोरे, माजी सदस्य रमेश पारधी, भरत खंडाईत उपस्थित होते.पीकविमा ऐच्छिक असला पाहिजेशेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम सक्तीने वसूली करू नका. सक्तीच्या पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे पीकविमा योजना ऐच्छिक असला पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे. आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांप्रमाणे १० हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी हा खरा देशभक्त असून या शेतकºयांना वृद्धापकाळात १० हजार रूपये पेन्शन देण्याची खरी गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले.