शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

काँग्रेस करणार कर्जमाफीचे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:25 IST

मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : यवतमाळ येथून २८ जूनपासून आंदोलनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेचा वर्षश्राद्ध करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाला प्रारंभ करण्यात येत आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पटोले म्हणाले, सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची रूपरेखा आखली आहे. याची सुरुवात यवतमाळ येथून गुरूवारपासून होत आहे. १ जुलै रोजी अकोला, २ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील शहापूर असे येत्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.मागील चार वर्षाच्या कार्यकाळात जिथे दुष्काळ पडला तिथे मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. परंतु शेतकऱ्यांना मदत दिली नाही. त्या शेतकºयांना सरसकट मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची तारीख ३० जूनपर्यंत वाढविली असून हे सरकार समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.पत्रपरिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती प्रेमदास वनवे, जि.प. सदस्य आकाश कोरे, माजी सदस्य रमेश पारधी, भरत खंडाईत उपस्थित होते.पीकविमा ऐच्छिक असला पाहिजेशेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम सक्तीने वसूली करू नका. सक्तीच्या पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे पीकविमा योजना ऐच्छिक असला पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे. आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांप्रमाणे १० हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी हा खरा देशभक्त असून या शेतकºयांना वृद्धापकाळात १० हजार रूपये पेन्शन देण्याची खरी गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले.