शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

काँग्रेसने पाळला ‘काळा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:42 IST

गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही.

ठळक मुद्देनिदर्शने करून केला निषेध : नोटबंदीत मृत्युमुखी पडलेल्यांना वाहिली श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही. सर्वसामान्यांनी कर रूपाने दिलेले साडे सहा लाख कोटी रूपये उद्योगपतींना वाटले, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला.निश्चलनीकरणाच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेसने ‘काळा दिवस’ म्हणून पाळला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात काळ्या फिती लावून काँग्रेसने निदर्शने केली.पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीची घोषणा करीत ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे हाल झाले होते. नोटबंदीच्या उद्योगधंदे ठप्प पडले. पैसे असूनही बँकेतून पैसा काढता येत नसल्याने लग्नकार्य अडले. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून केवळ मरण स्वस्त झाले, अशी टीका प्रदेश सचिव प्रमिला कुटे यांनी केली.यावेळी नोटबंदीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निदर्शने कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन सीमा भुरे यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, अनीक जमा पटेल, धनराज साठवणे, अजय गडकरी, अमर रगडे, राजकपूर राऊत, मनोहर उरकुडकर, आशिष पात्रे, स्वाती लिमजे, रमेश डोंगरे, भूमेश्वर महावाडे, सुनील गिº्हेपुंजे, शंकर राऊत, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, गणेश निमजे, जाबीर मालाधारी, नीळकंठ टेकाम, जनार्धन निंबार्ते, शंकर तेलमासरे, माणिकराव ब्राह्मणकर, मंगेश हुमणे व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जिल्हा, तालुका, शहर, बुथ कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, एनएसयूआय, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.