शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

काँग्रेसने शेतकऱ्यांना खाईत लोटले

By admin | Updated: June 28, 2015 00:43 IST

स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचेच सरकार होते. या ६० वर्षात काँग्रेसने गोरगरीब जनतेला, शेतकरी व शेतमजुरांना काहीही दिले नाही.

सेंदुरवाफा येथे प्रचारसभा : नितीन गडकरी यांची घणाघाती टीका साकोली : स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचेच सरकार होते. या ६० वर्षात काँग्रेसने गोरगरीब जनतेला, शेतकरी व शेतमजुरांना काहीही दिले नाही. ६० वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी, पक्षाला कंटाळून आत्महत्याच केली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने ६० वर्षात काही न करता एका वर्षाच्या भाजप सरकावर टीका करीत आहेत. त्यामुळे साठ वर्षात तुम्ही काय केले, ते आधी सांगा नंतर आम्हाला विचारा, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सेंदूरवाफा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, उपेंद्र कोठेकर, डॉ.प्रकाश मालगावे, डॉ.उल्हास फडके, तारीक कुरैशी, शिवराम गिऱ्हेपुंजे, सभापती नारायण वरठे, तालुका अध्यक्ष शंकर राऊत, वामनराव बेदरे, माजी सभापती रेखा भाजीपाले, महिला तालुका अध्यक्ष इंद्रायणी कापगते, बंडू बोरकर, नेपाल रंगारी उपस्थित होते.यावेळी ना.गडकरी म्हणाले, देशात काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशातील दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने, शाळांची अवस्था दयनीय होती. यापूर्वीच्या भाजपच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १.७० लाख गावांना पक्के रस्ते तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात तयार करण्यात आले. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात जलमार्ग विकसीत करण्यात येणार आहे. यापासून रोजगार निर्मिती होणार आहे. जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत १६ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडून या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर्षी लाखनी, साकोली व सौंदड येथून उड्डान पुलाचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. जाहीर सभेचे संचालन माजी सभापती गीता कापगते यांनी केले. कार्यक्रमाला किशोर पोगडे, नितीन खेडीकर, मंदार खेडीकर, ललीत खराबे, भिमावती पटले यांच्यासह भाजपचे महामंत्री भरत खंडाईत, डॉ.उल्हास बुराडे, सत्यवान हुकरे, बबलु निंबेकर, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवारांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)तुमसरातील धान घोटाळ्याची चौकशी होणारकाँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात भंडारा जिल्ह्यात घोटाळेच घोटाळे झाले. तुमसर येथे कोट्यवधीचा झालेल्या धान घोटाळ्याची आता लवकरच एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. विरोधी पक्षातील लोक भाजपावर आरोप करून धानाच्या पेंड्या जाळणारे व पदयात्रा काढणारे आता कुठे गेले? असा सवाल करीत आहेत. त्यांना एवढेच सांगायचे की, नाना पटोले पूर्वीही शेतकऱ्यांच्या पाठिशी होते व आताही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी यावेळी दिली.