शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:23 IST

गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांचे नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या समस्या सोडवा : १८ तास वीज पुरवठ्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांचे नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या लक्षात असताना केवळ कोरडे आश्वासन दिले जात आहे, असा आरोप करून नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचे आवाहन केले होेते. त्या अनषंगाने सोमवारला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्र्यांना घेराव करून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याचे आश्वासन दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना आठ तासापेक्षा कमी वीज पुरवठा होत आहे. कृषीपंपावर आधारीत शेतकरी संकटात सापडला आहे. आश्वासनाची पुर्तता करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्यात येईल, असा सज्जड दम देण्यात आला. ना. बावनकुळे यांनी बुधवारपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास व रात्रीला सहा तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाची पुर्तता न झाल्यास जिल्ह्यातील प्रवेशावर बंदी आणावी असे आश्वासन पालकमंत्र्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रशांत पवार, जिल्हा परिषद सभापती प्रेम वनवे, रेखा वासनिक, अमर रगडे, डॉ. पंकज कारेमोरे, प्रदीप बुराडे, मुकूंद साखरकर, कमलाकर निखाडे, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.