शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:23 IST

गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांचे नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या समस्या सोडवा : १८ तास वीज पुरवठ्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांचे नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या लक्षात असताना केवळ कोरडे आश्वासन दिले जात आहे, असा आरोप करून नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचे आवाहन केले होेते. त्या अनषंगाने सोमवारला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्र्यांना घेराव करून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याचे आश्वासन दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना आठ तासापेक्षा कमी वीज पुरवठा होत आहे. कृषीपंपावर आधारीत शेतकरी संकटात सापडला आहे. आश्वासनाची पुर्तता करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्यात येईल, असा सज्जड दम देण्यात आला. ना. बावनकुळे यांनी बुधवारपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास व रात्रीला सहा तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाची पुर्तता न झाल्यास जिल्ह्यातील प्रवेशावर बंदी आणावी असे आश्वासन पालकमंत्र्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रशांत पवार, जिल्हा परिषद सभापती प्रेम वनवे, रेखा वासनिक, अमर रगडे, डॉ. पंकज कारेमोरे, प्रदीप बुराडे, मुकूंद साखरकर, कमलाकर निखाडे, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.