शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बांधकाम, रोहयोच्या मुद्यावर ग्रामसभेत गोंधळ

By admin | Updated: May 2, 2017 00:51 IST

खुटसावरी येथे महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेत शौचालय बांधकाम, रोहयो यासह अनेक मुद्दयावर चांगलाच गोंधळ उडाला.

खुटसावरी ग्रामस्थांमध्ये असंतोष : गदारोळानंतर ग्रामसेवक-रोजगार सेवक पळाले भंडारा : खुटसावरी येथे महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेत शौचालय बांधकाम, रोहयो यासह अनेक मुद्दयावर चांगलाच गोंधळ उडाला. पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे ग्रामसेवक, रोजगार सेवक निघून गेले. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. शौचालय बांधकाम, रोहयोच्या कामात झालेल्या गैरव्यहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुलूपबंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ग्रामसभेचे आयोजन ग्रा.पं. कार्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली होती. मात्र ग्रामसभा वेळेवर सुरु झाली नाही. यावेळी कार्यालयात ग्रामस्थांची गर्दी उसळली होती. गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने ऐनवेळेवर सभेचे स्थळ बदलविण्यात आले. भर उन्हात जिल्हा परीषद शाळेच्या पटांगणात सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच विजय वासनिक होते. ग्रामसेवक एस. एस. हातझाडे, पोलीस पाटील संघदीप भोयर, तंमुस अध्यक्ष पुरुषोत्तम गिऱ्हेपुंजे यांच्यासह ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, बचत गट व विविध समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेची सुरुवात ग्रामसेवकांनी मागील सभेच्या विषयाच्या वाचनाने केली. अपंग लाभार्थ्यांना रक्कमेचे वितरण करण्यात आले. त्यानंतर धनराज गायधनी यांनी शौचालय बांधकाम, रोहयो कामात गैरव्यवहाराचे पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली असता उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे समर्थन केले. यावर ग्रामसेवक यांनी सभेचे अध्यक्ष उत्तर देतील, असे सांगितले. सरपंच उत्तर देत असताना रोजगार सेवक खुलासा करीत असतानाच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर ग्रामसेवक, रोजगार सेवक हे सभा सोडून निघून गेले. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ग्रामस्थांनी सभास्थळी चर्चा करुन थेट ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी केली. तेथे सरपंचांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. शौचालय बांधकाम, रोहयोच्या कामात झालेल्या गैरव्यहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, रोजगार सेवकाचे पद बदलवून नव्याने नियुक्ती करावी, या मागणीवर ठाम होते. पुढील सभेत चर्चा करु, असे आश्वासन सरंपचांनी दिले. यावर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. गदारोळातच सभा आटोपली. दारुबंदीसह अनेक निर्णय होऊ शकले नाही. गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी तंमुस पदाधिकाऱ्यांनी केली.(नगर प्रतिनिधी)ग्रामसभेदरम्यान करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. शौचालय बांधकाम गैरव्यवहाराचा एकतरी पुरावा द्यावा. सभेत गदारोळ करुन प्रश्न सुटणार नाहीत. गावाच्या विकासासाठी सहकार्य करा.-विजय वासनिक, सरपंच , खुटसावरीग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसभेत नियोजित विषयावर चर्चा करण्यात आली. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय उशीरा प्राप्त झाल्यामुळे ते विषय पुढील सभेत घेण्याचे ठरले. टेकेपार येथे सकाळी ११.३० वाजताची ग्रामसभा असल्याने निघून गेलो. त्यामुळे ग्रामसभा सोडून गेल्याचा मुद्दाच नाही.- एस.एस.हातझाडे, ग्रामसेवक, खुटसावरी