शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

शेतकऱ्याने दिलेल्या मदतीतून शाळा झाली संगणकीकृत

By admin | Updated: December 13, 2014 22:32 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पालक आणि समाजाच्या सहकार्यातून गुणवत्ता विकासाचे खराशी शाळेचा उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरला आहे. आता हा उपक्रम जिल्ह्यातील संपूर्ण

गवराळा येथील उपक्रम : मुबारक सय्यद यांचा पुढाकारभंडारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पालक आणि समाजाच्या सहकार्यातून गुणवत्ता विकासाचे खराशी शाळेचा उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरला आहे. आता हा उपक्रम जिल्ह्यातील संपूर्ण शाळांमध्ये राबविण्यासाठी खराशी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सैय्यद हे धडपडत आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन गवराळा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील सरपाते यांनी मुबारक सैय्यद यांना गवराळा येथील पालक सभेला मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सैय्यद यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्जनासाठी केलेले दान कसे सर्वश्रेष्ठ असते, हे ग्रामस्थांना पटवून दिले.त्यांच्या मार्गदर्शनाने भारावलेले गवराळा येथील शेतकरी प्रभाकर खरकाटे यांनी स्वत:चे पाल्य जिल्हा परिषद शाळेत शिकत नसतानाही ही शाळा संगणकीकृत व्हावी, यासाठी एक लाख रुपयांचा वैयक्तिक निधी मुख्याध्यापक सरपाते यांच्या स्वाधीन केले. या देणगीमधून या शाळेत सात संगणक लावण्यात आले. आता या शाळेत अद्ययावत संगणक प्रयोगशाळा साकार झाली आहे. गवराळा जिल्हा परिषद शाळा मुबारक सैय्यद यांनी दत्तक घेतली आहे. गवराळा शाळेचे मुख्याध्यापक सुनिल सरपाते हे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून गुणवत्ता विकासासाठी धडपडत आहेत. मागील दोन वर्षात या शाळेचे दोन विद्यार्थी नवोदयला तर चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मुबारक सैय्यद यांच्या मार्गदर्शनाने भारावलेल्या प्रभाकर खरकाटे यांचा सत्कार करण्यासाठी सय्यद यांनी पुढाकार घेतला. या सत्कार कार्यक्रमात खरकाटे यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आव्हान त्यांनी ग्रामस्थांना केले. त्यानंतर ग्रामस्थांनी तासाभरात एक लाख रुपयांचा निधी गोळा केला. या निधीतून शाळा सुसज्ज व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी ग्रामस्थांनी आणि समाजाने खरकाटे यांचा आदर्श घेतला तर जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांना चांगले दिवस येतील, यात शंका नाही. (जिल्हा प्रतिनिधी)