शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

देशात संगणक क्रांतीने रोवली आधुनिकतेची मुहूर्तमेढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST

भंडारा : काळानुरूप बदल होणे कधीही अपेक्षित आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. असाच एक निर्णय देशाचे ...

भंडारा : काळानुरूप बदल होणे कधीही अपेक्षित आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. असाच एक निर्णय देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी घेतला. देशात संगणक क्रांतीच्या मुहूर्तमेढीमुळे आधुनिकतेची कास भारताने धरली. याचाच परिणाम आज प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले.

साकोली येथे जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या शाखेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक कापगते, साकोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते, माजी जिल्हाधिकारी किशोर गजभिये, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मोहन पडोळे, प्रभाकर कळंबे, वैद्य, येळणे, पुरोगामी संघटनेचे लालबहादूर काळबांधे, वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष अशपाख खान, माजी संचालक नंदू रामटेके, शिक्षक नेते बी.टी. पांगूळ, श्रावण लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. अभिजित वंजारी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले, तसेच सभासदांकरिता गृहकर्ज योजना राबवावी असे सुचविले. आ. नाना पटोले पुढे म्हणाले, जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासणारी सोसायटी आहे. साकोलीत या इमारतीचे लोकार्पण करून शहराच्या वैभवामध्ये भर पडली आहे.

तसेच राष्ट्रीयीकृत बँकेसोबत पतसंस्थेच्या कारभार व प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. उल्लेखनीय म्हणजे प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे यांनी गत पाच वर्षांत सभासदांच्या हितार्थ राबविण्यात आलेल्या योजनांची व निर्णयांची माहिती दिली. यात सभासद कर्ज, व्याजदर टप्प्याटप्प्याने १२ टक्क्यांहून ९ टक्क्यांपर्यंत आणणे, सभासदाचा मृत्यू झाल्यास मृत्यूफंड कर्जमाफ मर्यादा ६ लक्ष वरून १४ लक्ष रुपये, कर्ज निरंक असणाऱ्या मृत सभासदांच्या वारसांना ५० हजार रुपये, डीसीपीएसधारक सभासदांचा मृत्यू झाल्यास २ लक्ष रुपये आर्थिक आधार देण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.

संचालन दिलीप ब्राह्मणकर यांनी केले. आभार देवराम थाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, शाखाध्यक्ष एम.पी. वाघाये, किशोर ईश्वरकर, पी.आर. पारधी, गणेश साळुंखे, नामदेव गभणे, दिनेश घोडीचोर, विलास टिचकुले, विजयकुमार डोये, नूतन बांगरे, शैलेश बैस, अविनाश शहारे, विनोद राठोड, दिलीप बावनकर, दीक्षा फुलझेले, संध्या गिऱ्हेपुंजे, दुर्गादास भड, प्रधान व्यवस्थापक विलास फटे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

‘त्या’ कल्याण निधीची मर्यादा २० हजार रुपये

संस्थेतर्फे विविध योजना राबविण्यात येतातच. याशिवाय एखादा सभासद मृत पावल्यास त्याचवेळी अंत्यविधीकरिता किंवा सेवानिवृत्तीच्या वेळेस दिला जाणारा कल्याण निधी मर्यादा १० हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात आल्याचीही माहिती या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देण्यात आली. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध आर्थिक सोयी व सेवानिवृत्त सभासदांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने त्यांच्या ठेवी स्वीकारण्याकरिता शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी निवृत्त जिल्हाधिकारी गजभिये यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख पाहून गौरवोद्गार काढले.