शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

देशात संगणक क्रांतीने रोवली आधुनिकतेची मुहूर्तमेढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST

भंडारा : काळानुरूप बदल होणे कधीही अपेक्षित आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. असाच एक निर्णय देशाचे ...

भंडारा : काळानुरूप बदल होणे कधीही अपेक्षित आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. असाच एक निर्णय देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी घेतला. देशात संगणक क्रांतीच्या मुहूर्तमेढीमुळे आधुनिकतेची कास भारताने धरली. याचाच परिणाम आज प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले.

साकोली येथे जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या शाखेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक कापगते, साकोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते, माजी जिल्हाधिकारी किशोर गजभिये, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मोहन पडोळे, प्रभाकर कळंबे, वैद्य, येळणे, पुरोगामी संघटनेचे लालबहादूर काळबांधे, वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष अशपाख खान, माजी संचालक नंदू रामटेके, शिक्षक नेते बी.टी. पांगूळ, श्रावण लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. अभिजित वंजारी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले, तसेच सभासदांकरिता गृहकर्ज योजना राबवावी असे सुचविले. आ. नाना पटोले पुढे म्हणाले, जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासणारी सोसायटी आहे. साकोलीत या इमारतीचे लोकार्पण करून शहराच्या वैभवामध्ये भर पडली आहे.

तसेच राष्ट्रीयीकृत बँकेसोबत पतसंस्थेच्या कारभार व प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. उल्लेखनीय म्हणजे प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे यांनी गत पाच वर्षांत सभासदांच्या हितार्थ राबविण्यात आलेल्या योजनांची व निर्णयांची माहिती दिली. यात सभासद कर्ज, व्याजदर टप्प्याटप्प्याने १२ टक्क्यांहून ९ टक्क्यांपर्यंत आणणे, सभासदाचा मृत्यू झाल्यास मृत्यूफंड कर्जमाफ मर्यादा ६ लक्ष वरून १४ लक्ष रुपये, कर्ज निरंक असणाऱ्या मृत सभासदांच्या वारसांना ५० हजार रुपये, डीसीपीएसधारक सभासदांचा मृत्यू झाल्यास २ लक्ष रुपये आर्थिक आधार देण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.

संचालन दिलीप ब्राह्मणकर यांनी केले. आभार देवराम थाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, शाखाध्यक्ष एम.पी. वाघाये, किशोर ईश्वरकर, पी.आर. पारधी, गणेश साळुंखे, नामदेव गभणे, दिनेश घोडीचोर, विलास टिचकुले, विजयकुमार डोये, नूतन बांगरे, शैलेश बैस, अविनाश शहारे, विनोद राठोड, दिलीप बावनकर, दीक्षा फुलझेले, संध्या गिऱ्हेपुंजे, दुर्गादास भड, प्रधान व्यवस्थापक विलास फटे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

‘त्या’ कल्याण निधीची मर्यादा २० हजार रुपये

संस्थेतर्फे विविध योजना राबविण्यात येतातच. याशिवाय एखादा सभासद मृत पावल्यास त्याचवेळी अंत्यविधीकरिता किंवा सेवानिवृत्तीच्या वेळेस दिला जाणारा कल्याण निधी मर्यादा १० हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात आल्याचीही माहिती या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देण्यात आली. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध आर्थिक सोयी व सेवानिवृत्त सभासदांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने त्यांच्या ठेवी स्वीकारण्याकरिता शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी निवृत्त जिल्हाधिकारी गजभिये यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख पाहून गौरवोद्गार काढले.