शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलैअखेर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची पीक कर्ज वाटपाची प्रगती चांगली असून या बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकानीही शेतकऱ्यांना ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची पीक कर्ज वाटपाची प्रगती चांगली असून या बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकानीही शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज द्यावे. बँकानी त्यांना दिलेले उद्दिष्ट जुलैअखेर १०० टक्के पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सोमवारी दिले. जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टाच्या ५१ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून त्यात सर्वाधिक वाटा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे.येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक एस. एस. खांडेकर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, नाबार्डचे महाव्यवस्थापक संजय देवगीरकर आणि बँकाचे अधिकारी उपस्थित होते.खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाखांचे उद्दिष्ट आहे. २० जूनपर्यंत २१२ कोटी ४२ लाख कर्ज वाटप करण्यात आले. यात जिल्हा बँकेचा वाटा १८० कोटी ७३ लाख आहे. बँकानी जुलैअखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिले.सामाजिक सुरक्षा योजनाचे सक्रिय व निष्क्रीय खाते पाहून निष्क्रीय खात्यांना सक्रिय करण्यासाठी मदत करण्याची सुचना त्यांनी दिली. प्रत्येक बँकानी दर तीन दिवसांनी पीक कर्ज वाटपाची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापकांना पुरविण्याचे निर्देश दिले. या बैठकीत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी प्रगतीचा आढावा सादर केला.गावनिहाय कर्जवाटप मेळावेशेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना कोणतीही अडचण येवू नये यासाठी गावनिहाय कर्ज वाटप मेळावे घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. कर्ज वाटपाचा नियमित अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविणे आवश्यक असल्याचे सांगून बँकाना मनापासून काम करण्याच्या सुचना दिल्या.७१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यात मे अखेर ७१ हजार ६६६ सभासद शेतकऱ्यांना १९५ कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. वंचित शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.खांडेकर यांचा सत्कारअग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रशासन व बँक यांच्यात उत्तम समन्वय ठेवला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांच्याहस्ते करण्यात आला. खांडेकर यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांप्रती आत्मीयता ठेवत उत्कृष्ठ कार्य केले. बँकाना लोकाभिमूख करण्यासाठी त्यांचा सदैव प्रयत्न असतो.