शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडीचे अपूर्ण कालवे पूर्ण करा

By admin | Updated: March 5, 2017 00:36 IST

बावनथडी प्रकल्पा अंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, टाकला, उसर्रा, विहीरगाव, मोरगाव, महालगाव, धोप, काटेबाम्हणी, पालडोंगरी या गाव परिसरातील ...

सिंचनाची समस्या : शेतकरी चिंतातूर, निधीची तरतूद करणे गरजेचेभंडारा : बावनथडी प्रकल्पा अंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, टाकला, उसर्रा, विहीरगाव, मोरगाव, महालगाव, धोप, काटेबाम्हणी, पालडोंगरी या गाव परिसरातील अपूर्ण कालवे पूर्ण करून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी शेतमजूर एकता मंचच्या जिल्हा अध्यक्षा तथा डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या गभने यांनी केली आहे.बावनथडी प्रकल्पाचे कालवे निर्माण करून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन संपादित करण्यात आली. काही प्रमाणात कामे सुरू करून निधी अभावी बंद पाडण्यात आली होती. त्यामुळे कालवे अपूर्ण असल्याने टेलपर्यंत सिंचनाची व्यवस्था होऊ शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पादन काढता येत नसल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळेच मोहाडी तालुक्यातील कालव्याचे काम अपूर्ण राहीले हे सत्य असले तरी विद्यमान सरकारने बावनथडी प्रकल्पा अधिनस्त मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, उसर्रा, टाकला, टांगा, विहीरगाव, काटेबाम्हणी, धोप, पालडोंगरी या गाव परिसरातील अपूर्ण कालवे पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करून अपूर्ण कामे पूर्ण करणे काळाची गरज आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डोंगरगाव परिसरातील अपूर्ण कालव्यांची प्रत्यक्ष मोका पाहणी करून शासनाकडे निधीची मागणी करणे गरजेचे असताना संबंधित विभागाचे याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने डोंगरगाव, काटेबाम्हणी, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, टांगा, कुशारी, टाकला, उसर्रा या गाव परिसरातील शेतकरी अजुनही बावनथडी प्रकल्पच्या सिंचनापासून वंचित आहेत. सिंचनाची व्यवस्था रखडली असल्याने सर्व शेतकरी पिक उत्पादनाअभावी आर्थिक संकटात सापडले असून यामुळे त्यांचे बेहाल होत असून ते चिंतातूर हवालदिल व वैफल्यग्रस्त झाले आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासन प्रशासनाने याबाबत वेळीच दखल घेवून तसेच सम्यक विचार करून बावनथडी प्रकल्पाअंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, काटेबाम्हणी, टाकला, उसर्रा, विहिरगाव, कुशारी या गाव परिरातील अपूर्ण कावले तात्काळ पूर्ण करण्याची निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)