शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

बावनथडीचे अपूर्ण कालवे पूर्ण करा

By admin | Updated: March 5, 2017 00:36 IST

बावनथडी प्रकल्पा अंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, टाकला, उसर्रा, विहीरगाव, मोरगाव, महालगाव, धोप, काटेबाम्हणी, पालडोंगरी या गाव परिसरातील ...

सिंचनाची समस्या : शेतकरी चिंतातूर, निधीची तरतूद करणे गरजेचेभंडारा : बावनथडी प्रकल्पा अंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, टाकला, उसर्रा, विहीरगाव, मोरगाव, महालगाव, धोप, काटेबाम्हणी, पालडोंगरी या गाव परिसरातील अपूर्ण कालवे पूर्ण करून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी शेतमजूर एकता मंचच्या जिल्हा अध्यक्षा तथा डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या गभने यांनी केली आहे.बावनथडी प्रकल्पाचे कालवे निर्माण करून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन संपादित करण्यात आली. काही प्रमाणात कामे सुरू करून निधी अभावी बंद पाडण्यात आली होती. त्यामुळे कालवे अपूर्ण असल्याने टेलपर्यंत सिंचनाची व्यवस्था होऊ शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पादन काढता येत नसल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळेच मोहाडी तालुक्यातील कालव्याचे काम अपूर्ण राहीले हे सत्य असले तरी विद्यमान सरकारने बावनथडी प्रकल्पा अधिनस्त मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, उसर्रा, टाकला, टांगा, विहीरगाव, काटेबाम्हणी, धोप, पालडोंगरी या गाव परिसरातील अपूर्ण कालवे पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करून अपूर्ण कामे पूर्ण करणे काळाची गरज आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डोंगरगाव परिसरातील अपूर्ण कालव्यांची प्रत्यक्ष मोका पाहणी करून शासनाकडे निधीची मागणी करणे गरजेचे असताना संबंधित विभागाचे याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने डोंगरगाव, काटेबाम्हणी, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, टांगा, कुशारी, टाकला, उसर्रा या गाव परिसरातील शेतकरी अजुनही बावनथडी प्रकल्पच्या सिंचनापासून वंचित आहेत. सिंचनाची व्यवस्था रखडली असल्याने सर्व शेतकरी पिक उत्पादनाअभावी आर्थिक संकटात सापडले असून यामुळे त्यांचे बेहाल होत असून ते चिंतातूर हवालदिल व वैफल्यग्रस्त झाले आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासन प्रशासनाने याबाबत वेळीच दखल घेवून तसेच सम्यक विचार करून बावनथडी प्रकल्पाअंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, काटेबाम्हणी, टाकला, उसर्रा, विहिरगाव, कुशारी या गाव परिरातील अपूर्ण कावले तात्काळ पूर्ण करण्याची निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)