शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडीचे अपूर्ण कालवे पूर्ण करा

By admin | Updated: March 5, 2017 00:36 IST

बावनथडी प्रकल्पा अंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, टाकला, उसर्रा, विहीरगाव, मोरगाव, महालगाव, धोप, काटेबाम्हणी, पालडोंगरी या गाव परिसरातील ...

सिंचनाची समस्या : शेतकरी चिंतातूर, निधीची तरतूद करणे गरजेचेभंडारा : बावनथडी प्रकल्पा अंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, टाकला, उसर्रा, विहीरगाव, मोरगाव, महालगाव, धोप, काटेबाम्हणी, पालडोंगरी या गाव परिसरातील अपूर्ण कालवे पूर्ण करून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी शेतमजूर एकता मंचच्या जिल्हा अध्यक्षा तथा डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या गभने यांनी केली आहे.बावनथडी प्रकल्पाचे कालवे निर्माण करून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन संपादित करण्यात आली. काही प्रमाणात कामे सुरू करून निधी अभावी बंद पाडण्यात आली होती. त्यामुळे कालवे अपूर्ण असल्याने टेलपर्यंत सिंचनाची व्यवस्था होऊ शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पादन काढता येत नसल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळेच मोहाडी तालुक्यातील कालव्याचे काम अपूर्ण राहीले हे सत्य असले तरी विद्यमान सरकारने बावनथडी प्रकल्पा अधिनस्त मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, उसर्रा, टाकला, टांगा, विहीरगाव, काटेबाम्हणी, धोप, पालडोंगरी या गाव परिसरातील अपूर्ण कालवे पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करून अपूर्ण कामे पूर्ण करणे काळाची गरज आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डोंगरगाव परिसरातील अपूर्ण कालव्यांची प्रत्यक्ष मोका पाहणी करून शासनाकडे निधीची मागणी करणे गरजेचे असताना संबंधित विभागाचे याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने डोंगरगाव, काटेबाम्हणी, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, टांगा, कुशारी, टाकला, उसर्रा या गाव परिसरातील शेतकरी अजुनही बावनथडी प्रकल्पच्या सिंचनापासून वंचित आहेत. सिंचनाची व्यवस्था रखडली असल्याने सर्व शेतकरी पिक उत्पादनाअभावी आर्थिक संकटात सापडले असून यामुळे त्यांचे बेहाल होत असून ते चिंतातूर हवालदिल व वैफल्यग्रस्त झाले आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासन प्रशासनाने याबाबत वेळीच दखल घेवून तसेच सम्यक विचार करून बावनथडी प्रकल्पाअंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, काटेबाम्हणी, टाकला, उसर्रा, विहिरगाव, कुशारी या गाव परिरातील अपूर्ण कावले तात्काळ पूर्ण करण्याची निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)