शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री घरकूल योजनेत साडेआठ हजार घरकूल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:18 IST

जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ७६४ घरकूल पूर्ण झाले आहेत तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ७६४ घरकूल पूर्ण झाले आहेत तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील तीन वर्षात १५ हजार ४५३ घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी सात हजार ८६४ घरकुल पूर्ण झाले असून प्रपत्र ड मध्ये १६ हजार घरकुलांची डाटा ऐंट्री करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १२ योजना सुरू आहेत. त्यावर आठ कोटी पाच लाख रूपयांचा खर्च होणार आहे.त्यापैकी २०१८ अखेरपर्यंत नऊ योजना पूर्ण होणार आहे. कृषी पंपांना वीज पुरवठ्यांतर्गत ५० कोटी रूपयांच्या कामाचे कार्यारंब आदेश देण्यात आले आहे. ही कामे डिसेंबर २०१९ पर्यंतपूर्ण होणार असल्याची माहिती दिली.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत २०१७-१८ मध्ये १६२ लाभार्थ्यांना ५३ लाख ४१ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेत १३७५ पैकी १२५२ कामे पूर्ण झाली असून त्यावर १२ कोटी ६५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. २०१८-१९ मध्ये १४० गावांमधील २२२७ कामांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे.या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड उपस्थित होते.न्यायालयाचा स्थगनादेशाने अतिक्रमण हटविले नाहीअशोक लेलँड कंपनीच्या चिखली हमेशा येथील जागेबाबत जुलै १९९४ मध्ये कंपनीने न्यायालयात रिट याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाकडून अंतिम स्थगनादेश देण्यात आले आहे. डिसेंबर २००५ मध्ये कंपनीने केंद्र सरकारकडे वनजमीन मागणीवा प्रस्ताव सादर केला. राज्य शासनाने एप्रिल २००५ मध्ये तो प्रस्ताव पाठविला. कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केलेले प्रकरण पुन्हा सुनावनीस आले. २० जून २००६ च्या आदेशान्वये कंपनीच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाचा निर्णय होईपर्यंत व त्यानंतर एक महिन्यापर्यंत आॅक्टोबर १९९४ मधील दिलेला स्थगनादेश कायम राहिल, असा न्यायालयाचा आदेश आहे. कंपनीचे जमीन मागणी प्रकरण प्रलंबित असल्याने व उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. जिल्हा प्रशासन कुणालाही पाठीशी घातल नसल्याचे त्यांची सांगितले.