शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

प्रधानमंत्री घरकूल योजनेत साडेआठ हजार घरकूल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:18 IST

जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ७६४ घरकूल पूर्ण झाले आहेत तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ७६४ घरकूल पूर्ण झाले आहेत तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील तीन वर्षात १५ हजार ४५३ घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी सात हजार ८६४ घरकुल पूर्ण झाले असून प्रपत्र ड मध्ये १६ हजार घरकुलांची डाटा ऐंट्री करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १२ योजना सुरू आहेत. त्यावर आठ कोटी पाच लाख रूपयांचा खर्च होणार आहे.त्यापैकी २०१८ अखेरपर्यंत नऊ योजना पूर्ण होणार आहे. कृषी पंपांना वीज पुरवठ्यांतर्गत ५० कोटी रूपयांच्या कामाचे कार्यारंब आदेश देण्यात आले आहे. ही कामे डिसेंबर २०१९ पर्यंतपूर्ण होणार असल्याची माहिती दिली.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत २०१७-१८ मध्ये १६२ लाभार्थ्यांना ५३ लाख ४१ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेत १३७५ पैकी १२५२ कामे पूर्ण झाली असून त्यावर १२ कोटी ६५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. २०१८-१९ मध्ये १४० गावांमधील २२२७ कामांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे.या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड उपस्थित होते.न्यायालयाचा स्थगनादेशाने अतिक्रमण हटविले नाहीअशोक लेलँड कंपनीच्या चिखली हमेशा येथील जागेबाबत जुलै १९९४ मध्ये कंपनीने न्यायालयात रिट याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाकडून अंतिम स्थगनादेश देण्यात आले आहे. डिसेंबर २००५ मध्ये कंपनीने केंद्र सरकारकडे वनजमीन मागणीवा प्रस्ताव सादर केला. राज्य शासनाने एप्रिल २००५ मध्ये तो प्रस्ताव पाठविला. कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केलेले प्रकरण पुन्हा सुनावनीस आले. २० जून २००६ च्या आदेशान्वये कंपनीच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाचा निर्णय होईपर्यंत व त्यानंतर एक महिन्यापर्यंत आॅक्टोबर १९९४ मधील दिलेला स्थगनादेश कायम राहिल, असा न्यायालयाचा आदेश आहे. कंपनीचे जमीन मागणी प्रकरण प्रलंबित असल्याने व उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. जिल्हा प्रशासन कुणालाही पाठीशी घातल नसल्याचे त्यांची सांगितले.