शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

खोटे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:18 IST

सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : पाणी सोडण्याचे आश्वासनाचा विसर, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे, अधिकाºयांवर का नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.गत महिन्याभरापासून पावसाने दडी मारली. शेतकरी संकटात सापडला आहे. प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. मात्र प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर येवुन आंदोलन करीत आहेत. अशा आंदोलक शेतकऱ्यांवर प्रशासन तात्काळ गुन्हे दाखल करते. मात्र प्रकल्प अधिकारी व तहसीलदार आंदोलनाच्या ठिकाणी लेखी आश्वासन देतात. जिल्हाधिकारी पाणी सोडण्याची घोषणा करतात. पंरतु दहा दिवसानंतरही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. खोटे आश्वासन देणाºयांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत कमलेश कनोजे, आनंद मलेवार, राजेश लेंडे यांनी वरठी ठाण्यात तक्रार दाखल केली.लघु वितरिकेच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वरठी, एकलारी, पाचगाव, मोहगाव, बोथली, पांजरा, सोनुली, नेरी या भागात पाणीच मिळाले नाही. महिन्याभरापासून शेतकरी पाण्याची मागणी करीत आहे. पाऊस नसल्याने चार हजार हेक्टरमधील धानपीक हातचे गेले आहे. प्रकल्प अधिकारी व जिल्हा प्रशानाचे ठिसाळ नियोजन शेतकºयांना संकटाच्या घाईत उभे करीत आहे. अशा स्थितीत १ आॅक्टोबर रोजी वरठी येथील पाचगाव फाट्यावर आंदोलन केले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकाºयांनी ५ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. पण पाणी सोडले नाही उलट आंदोलकावर गुन्हे दाखल केले. आता शेतकºयांवर गुन्हे दाखल होत असेल तर अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल का करु नये, असा सवाल शेतकºयांनी केला आहे. वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यावेळी बोथलीचे माजी सरपंच कैलास तितीरमारे, मोहगाव माजी सरपंच राजेश लेंडे, ज्ञानीराम साखरवाडे, दिनकर लांबट, अनिल काळे आदी उपस्थित होते. पोलिसांनी प्रकरण तुर्तास चौकशीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.एका पाण्याने हातचे गेले पीकमहिन्याभरापासून पावसाने दडी मारली. एका पाण्याने धानपिक हातचे गेले आहे. मोहाडी तालुक्यातील शेकडो हेक्टर धानपीक उध्दवस्त होत आहे. दुसरीकडे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी असून हे पाणी नदीतून वाहत आहे. मात्र कालव्याद्वारे शेतकऱ्याच्या शेतात सोडले जात नाही. प्रकल्प अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे आश्वासन देते. मात्र शेतापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. आंदोलन करुनही पाणी सुटत नसल्याने आता नेमकी कोणती भुमिका घ्यावी अशा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. आता पाणी सोडले तरी उत्पादनात घट हमखास होणार आहे.