शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

खोटे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:18 IST

सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : पाणी सोडण्याचे आश्वासनाचा विसर, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे, अधिकाºयांवर का नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.गत महिन्याभरापासून पावसाने दडी मारली. शेतकरी संकटात सापडला आहे. प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. मात्र प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर येवुन आंदोलन करीत आहेत. अशा आंदोलक शेतकऱ्यांवर प्रशासन तात्काळ गुन्हे दाखल करते. मात्र प्रकल्प अधिकारी व तहसीलदार आंदोलनाच्या ठिकाणी लेखी आश्वासन देतात. जिल्हाधिकारी पाणी सोडण्याची घोषणा करतात. पंरतु दहा दिवसानंतरही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. खोटे आश्वासन देणाºयांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत कमलेश कनोजे, आनंद मलेवार, राजेश लेंडे यांनी वरठी ठाण्यात तक्रार दाखल केली.लघु वितरिकेच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वरठी, एकलारी, पाचगाव, मोहगाव, बोथली, पांजरा, सोनुली, नेरी या भागात पाणीच मिळाले नाही. महिन्याभरापासून शेतकरी पाण्याची मागणी करीत आहे. पाऊस नसल्याने चार हजार हेक्टरमधील धानपीक हातचे गेले आहे. प्रकल्प अधिकारी व जिल्हा प्रशानाचे ठिसाळ नियोजन शेतकºयांना संकटाच्या घाईत उभे करीत आहे. अशा स्थितीत १ आॅक्टोबर रोजी वरठी येथील पाचगाव फाट्यावर आंदोलन केले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकाºयांनी ५ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. पण पाणी सोडले नाही उलट आंदोलकावर गुन्हे दाखल केले. आता शेतकºयांवर गुन्हे दाखल होत असेल तर अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल का करु नये, असा सवाल शेतकºयांनी केला आहे. वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यावेळी बोथलीचे माजी सरपंच कैलास तितीरमारे, मोहगाव माजी सरपंच राजेश लेंडे, ज्ञानीराम साखरवाडे, दिनकर लांबट, अनिल काळे आदी उपस्थित होते. पोलिसांनी प्रकरण तुर्तास चौकशीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.एका पाण्याने हातचे गेले पीकमहिन्याभरापासून पावसाने दडी मारली. एका पाण्याने धानपिक हातचे गेले आहे. मोहाडी तालुक्यातील शेकडो हेक्टर धानपीक उध्दवस्त होत आहे. दुसरीकडे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी असून हे पाणी नदीतून वाहत आहे. मात्र कालव्याद्वारे शेतकऱ्याच्या शेतात सोडले जात नाही. प्रकल्प अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे आश्वासन देते. मात्र शेतापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. आंदोलन करुनही पाणी सुटत नसल्याने आता नेमकी कोणती भुमिका घ्यावी अशा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. आता पाणी सोडले तरी उत्पादनात घट हमखास होणार आहे.