शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

अपंगांच्या पुनर्वसनासाठी समाजाने समोर येण्याची गरज

By admin | Updated: December 6, 2014 01:05 IST

आदीवासी बहुल दुर्गम भागात अपंग व्यक्तीमध्ये आपल्या अपंगत्वावर मात करुन सामान्य जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी समाजातील ...

भंडारा : आदीवासी बहुल दुर्गम भागात अपंग व्यक्तीमध्ये आपल्या अपंगत्वावर मात करुन सामान्य जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने समोर येण्याची गरज आहे. असे प्रतिपादन निराश्रीत कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. एम. चौधरी यांनी केले.जागतिक अपंग दिन कार्यक्रम ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा द्वारा आदीवासी विकास प्रकल्प (वाडी) कार्यक्षेत्रातील आलेसूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटक पंचायत समिती तुमसरच्या सदस्या प्रभा पेंदाम, अपंग विकास महामंडळ जिल्हा भंडाराचे अनिल मेराम, अविल बोरकर, आलेसुरचे सरपंच हेमराज मेहर, प्रकल्प समन्वयक सुधिर धकाते, जिल्हा परिषद शाळा आलेसुरचे मुख्याध्यापक मेश्राम, लांजेवार, चिखलीचे उपसरपंच रोशन सावंतवान, खापा येथील पोलिस पाटील रामकृष्ण इळपाते, तंटामुक्ती अध्यक्ष चिखली उमराव कोहले उपस्थित होते. चौधरी म्हणाले शासनाने लादलेल्या जाचक शर्तीमुळे प्रत्येक गरजू विकलांग व्यक्तीला उपकरणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे उदान व्यक्ती, गाव, समाज व व्यापारी वर्ग, गैरशासकिय संस्था यांच्या सहकार्याची नितांत गरज दर्शविली. कित्येक अपंग सुशिक्षीतांच्या हाताला काम नाही म्हणून बेरोजगाराच्या स्थितीत जीवन जगत आहेत. अपंग व्यक्ती हा पुर्णत: दुसऱ्यावर अवलंबून आहे. त्यांना छोटे व्यवसाय प्रशिक्षणाची नितांत गरज या क्षेत्रासाठी आहे. अनिल मेश्राम यांनी अपंग विकास महामंडळ जिल्हा कार्यालय भंडाराच्या योजना व कर्ज प्रशिक्षणाची माहिती उपस्थितांना दिली. अविल बोकर यांनी आलेसूर परिसरात १० गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी या कार्यप्रसंगी केली. त्यानुसार २०० ते ८०० पर्यंत टि. डी. एस. असल्याचे आढळले. यावरुन या परिसरातील पाण्याचे स्त्रोत आरोग्याला धोकादायक आहे ते अपंगत्वाकडे घेऊन जावू शकते. याची भीती व्यक्त केली. याकरिता सार्वजनिक पाणी शुध्दीकरणाच्या योग्य पध्दती करण्याची मागणी ग्रामस्थांनी करावी असे उद्बोधन केले. संचालन कश्मीर मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश कुमार टेंभरे यांनी केले. कार्यक्रमासाठी जग्गनाथ कटरे, संजय सोनवाने, निर्मला उईके, निखिल सावंतवान यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)