शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध

By admin | Updated: May 28, 2017 00:27 IST

शेतकऱ्यांच्या उन्नत शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वाेत्तर प्रयत्न करीत आहे.

चरण वाघमारे : आमदारांनी जाणल्या शेतकऱ्यांच्या भावनालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या उन्नत शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वाेत्तर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत प्रगती होवून सक्षम शेतकरी निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा शेतकऱ्याच्या बांध्यांवर उपलब्ध करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगिण हितासाठी वचनबद्ध असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी शिवार संवाद फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.आ. चरण वाघमारे याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिवारात जावून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शिवार संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. चरण वाघमारे यांच्यासह संदीप ताले, कविता बनकर, भाऊराव तुमसरे, तारिक कुरैशी, बंडू बनकर, राहूल डोंगरे, हरेंद्र रहांगडाले, बाळकृष्ण गाढवे, राजेश पटले, ममता घडले, राजु तोलानी, नरेंद्र गौरे, सुरेश पारधी, मनिराम गावठे, निर्मला कापसे, रूपा सोनवाने, गुरूदेव भोंडे, प्रकाश दुर्गे, बाल्या मदनकर, अशोक उईके, नंदलाल खंडाते, रेखा धुर्वे, महेश उचिबगले, संजय कावळे, बंडू गौपाले, गोविंद खुने, फुलचंद गौपाले, अशोक रहांगडाले व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.आ. वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचे तात्काळ निर्देश दिले. आ. वाघमारे यांनी विरोधी पक्षाच्या १५ वर्षाच्या "जुल्मी" वनवासातून शेतकऱ्यांना भाजप सरकारने अडीच वर्षातच बाहेर काढून शेतीसंबंधाच्या सर्वच विभागाला भरभरून निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ वर्षात विरोधकांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांना फक्त २३ हजार विद्युत कनेक्शन शेतीसाठी फक्त आठ तास विज व एक इंचही सिंचन या काळात वाढली नाही. याउलट भाजप सरकारने अडीच वर्षात शेतकऱ्यांना दोन लाख ७५ हजार विद्युत कनेक्शन दिले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय व १२ तास विद्युत पुरवठा यासह शेततळे धडक सिंचन योजनेमार्फत दहा हजार विहिरी व विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठे करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे आता शेतीतही अच्छे दिवसाची सुरवात झाली असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी सांगितले. या शिवार संवाद फेरी कार्यक्रमाच्या माध्यमातून सितासावंगी, धुटेरा, पाथरी, डोंगरी बु., गर्रा बघेडा, आंबागड, लोहारा या पं.स. क्षेत्रातील शेतकऱ्यांचा आ. चरण वाघमारे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सोदेपूर येथे आ. वाघमारे यांनी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे भूमिपूजन करून अर्धातास शेतकऱ्यांसह तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.