शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:11 IST

शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, उत्कृष्ट कार्य करणाºयांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, डिजीटल शाळा अशा विविध क्षेत्रात जिल्हयाने आघाडी मिळविली असून येत्या काळात जिल्हयाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबध्द होऊ या, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते.पोलीस कवायत मैदान येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी परेड निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून कर्जात असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ४७ हजार शेतकºयांना ३११ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीपासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही.याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैअखेर जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँक मिळून ६० हजार ६०० शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला असून यापोटी चार कोटी ८८ रुपयाचा पीक विम्याचा हप्ता भरला आहे, असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.शेतीच्या सुपिकतेसोबतच उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात भंडारा जिल्हयात समाधानकारक काम झाले असून संपूर्ण लोकसहभागातून जिल्हयातील ५२ तलावातून ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यामुळे तलावाच्या पाणी पातळीत नक्की वाढ झाली असून जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.