शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:11 IST

शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, उत्कृष्ट कार्य करणाºयांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, डिजीटल शाळा अशा विविध क्षेत्रात जिल्हयाने आघाडी मिळविली असून येत्या काळात जिल्हयाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबध्द होऊ या, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते.पोलीस कवायत मैदान येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी परेड निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून कर्जात असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ४७ हजार शेतकºयांना ३११ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीपासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही.याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैअखेर जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँक मिळून ६० हजार ६०० शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला असून यापोटी चार कोटी ८८ रुपयाचा पीक विम्याचा हप्ता भरला आहे, असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.शेतीच्या सुपिकतेसोबतच उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात भंडारा जिल्हयात समाधानकारक काम झाले असून संपूर्ण लोकसहभागातून जिल्हयातील ५२ तलावातून ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यामुळे तलावाच्या पाणी पातळीत नक्की वाढ झाली असून जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.