शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:11 IST

शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, उत्कृष्ट कार्य करणाºयांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, डिजीटल शाळा अशा विविध क्षेत्रात जिल्हयाने आघाडी मिळविली असून येत्या काळात जिल्हयाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबध्द होऊ या, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते.पोलीस कवायत मैदान येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी परेड निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून कर्जात असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ४७ हजार शेतकºयांना ३११ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीपासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही.याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैअखेर जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँक मिळून ६० हजार ६०० शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला असून यापोटी चार कोटी ८८ रुपयाचा पीक विम्याचा हप्ता भरला आहे, असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.शेतीच्या सुपिकतेसोबतच उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात भंडारा जिल्हयात समाधानकारक काम झाले असून संपूर्ण लोकसहभागातून जिल्हयातील ५२ तलावातून ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यामुळे तलावाच्या पाणी पातळीत नक्की वाढ झाली असून जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.