शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

एकत्र येऊन गाव विकासाचा आराखडा तयार करा!

By admin | Updated: January 24, 2017 00:31 IST

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली तर गावच सोडा, संपूर्ण देशच विकासाची वाट धरेल.

नाना पटोले यांचे आवाहन : लाखांदूर येथे हागणदारीमुक्त उत्सव सोहळा, ४२ गावांतील सरपंचांचा सत्कारलाखांदुर : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली तर गावच सोडा, संपूर्ण देशच विकासाची वाट धरेल. राजकारण व पक्ष वाद गाव विकासाला अडचण ठरते, तेव्हा सर्वजण एकत्र येऊन गाव विकासाचा आराखडा तयार करा, आम्ही त्या शासन दरबारी मंजूर करवून घेऊ त्यानंतर सर्व गाव विकासाच्या योजना आपोआप आपल्या गावात लोटांगण घालतील, यातून संपूर्ण जिल्हा विकासाच्या दिशेने धावायला लागेल असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती लाखांदुरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त उत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यपालन अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, माधुरी हुकरे, शुद्धमता नंदागवळी, नेपाल रंगारी, सभापती मंगला बगमारे, उपसभापती वासुदेव तोंडरे, नगरसेवक विनोद ठाकरे, पं.स.सदस्य कुंडलिक पेलने, शिवाजी देशकर, गुलाब कापसे, राजेंद्र ठाकरे, नेहा बगमारे, कांता मेश्राम, सभापती अर्चना वैद्य, गटविकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर, गटविकास अधिकारी गिरीश धायगुडे, पी. टी. निर्वाण, ए. जी. हेडवू, बालविकास अधिकारी वैतागे, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आमदार बाळा काशिवार म्हणाले, हागणदारीमुक्त गाव हे केवळ कागदावर किंवा शासनाकडून पुरस्कार घेऊन होत नाही, अधिकारी किंवा पदाधिकारी हागणदारीमुक्त गाव करू शकत नाही तर गावातील प्रत्येक व्यकी, प्रत्येक कुटुंबप्रमुखाने मनात संकल्प करून स्वत:चे गाव स्वच्छ व निरोगी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिल्हाधिकारी म्हणाले, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी केवळ शासनाच्या निधीतून शौचालय बांधणे एवढेच महत्त्वाचे नाही तर शौचालयाचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, गावात स्वच्छता दिसली पाहिजे. याप्रसंगी ४२ गावातील सरपंच व सचिवांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला राहुल सपाटे यांनी स्वच्छ भारत अभियानावर आधारीत भजन कार्यक्रम पार पाडला, त्यानंतर असर फाऊंडेशन भंडारा च्या कलापथकाने स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले, संचालन सुरेश लंजे यांनी, तर प्रास्ताविक डि.एम.देवरे यांनी करून, आभार मेळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)