शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

एकत्र येऊन गाव विकासाचा आराखडा तयार करा!

By admin | Updated: January 24, 2017 00:31 IST

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली तर गावच सोडा, संपूर्ण देशच विकासाची वाट धरेल.

नाना पटोले यांचे आवाहन : लाखांदूर येथे हागणदारीमुक्त उत्सव सोहळा, ४२ गावांतील सरपंचांचा सत्कारलाखांदुर : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली तर गावच सोडा, संपूर्ण देशच विकासाची वाट धरेल. राजकारण व पक्ष वाद गाव विकासाला अडचण ठरते, तेव्हा सर्वजण एकत्र येऊन गाव विकासाचा आराखडा तयार करा, आम्ही त्या शासन दरबारी मंजूर करवून घेऊ त्यानंतर सर्व गाव विकासाच्या योजना आपोआप आपल्या गावात लोटांगण घालतील, यातून संपूर्ण जिल्हा विकासाच्या दिशेने धावायला लागेल असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती लाखांदुरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त उत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यपालन अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, माधुरी हुकरे, शुद्धमता नंदागवळी, नेपाल रंगारी, सभापती मंगला बगमारे, उपसभापती वासुदेव तोंडरे, नगरसेवक विनोद ठाकरे, पं.स.सदस्य कुंडलिक पेलने, शिवाजी देशकर, गुलाब कापसे, राजेंद्र ठाकरे, नेहा बगमारे, कांता मेश्राम, सभापती अर्चना वैद्य, गटविकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर, गटविकास अधिकारी गिरीश धायगुडे, पी. टी. निर्वाण, ए. जी. हेडवू, बालविकास अधिकारी वैतागे, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आमदार बाळा काशिवार म्हणाले, हागणदारीमुक्त गाव हे केवळ कागदावर किंवा शासनाकडून पुरस्कार घेऊन होत नाही, अधिकारी किंवा पदाधिकारी हागणदारीमुक्त गाव करू शकत नाही तर गावातील प्रत्येक व्यकी, प्रत्येक कुटुंबप्रमुखाने मनात संकल्प करून स्वत:चे गाव स्वच्छ व निरोगी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिल्हाधिकारी म्हणाले, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी केवळ शासनाच्या निधीतून शौचालय बांधणे एवढेच महत्त्वाचे नाही तर शौचालयाचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, गावात स्वच्छता दिसली पाहिजे. याप्रसंगी ४२ गावातील सरपंच व सचिवांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला राहुल सपाटे यांनी स्वच्छ भारत अभियानावर आधारीत भजन कार्यक्रम पार पाडला, त्यानंतर असर फाऊंडेशन भंडारा च्या कलापथकाने स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले, संचालन सुरेश लंजे यांनी, तर प्रास्ताविक डि.एम.देवरे यांनी करून, आभार मेळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)