शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

समूह शेतीसाठी सकारात्मक विचाराने एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:43 IST

शेतीत नवीन प्रयोग करीत पीक पद्धत बदलविणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना मार्गदर्शन : पालांदूर येथील सभेत मंगेश घोळके यांचे आवाहन

आॅनलाईन लोकमतपालांदूर : शेतीत नवीन प्रयोग करीत पीक पद्धत बदलविणे काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनात व दर्जामध्ये सुधारणा व्हावी, याकरिता शेतकऱ्यांनी समूह पद्धतीने शेती करणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांनी केले.पालांदूर येथील ग्रामपंचायत सभागृहात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र कुरेकार, माजी सभापती दिलवर रामटेके, कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके, अनिल शहारे, कृषी सहाय्यक चुडाराम नंदनवार, श्रीकांत सपाटे, शिल्पा खंडाईत, विभा शिवणकर, व्ही.सी. गिऱ्हेपुंजे, पपीता टिचकुले, घनश्याम पाटील व मदन बोळणे उपस्थित होते. कृषीचे पदवीधर मदन बोळणे यांनी ठिबक व मल्चींगचे वैशिष्ट्ये समजावून सांगितले. घनश्याम पाटील यांनी देखभाल, दुरुस्ती नियोजन याविषयावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नांची सरबत्ती करीत उत्तर घेत समधानाने तात्काळ समूह / गट तयार करीत शासनाच्या हाकेला साथ दिली.नरव्हा, पाथरी, मºहेगाव, ढिवरखेडा, पालांदूर येथील शेतकºयांनी सहभाग घेतला होता. भाजीपाल्यातील विविध पिके घेत परिसरात समृद्धी व्हावी, याकरिता शेतकरी स्वत:च प्रामाणिकतेने सरसावलेला दिसत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातून उत्पादन, विक्री व व्यवस्थापनाचे धडे नियमित सुरु राहत शेतकºयांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडण्याचा मुख्य हेतू पुढे आला आहे.दामाजी खंडाईत यांनी कृषी अधिकाºयांना कार्यतत्पर होत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत नवनवीन तंत्रज्ञान पोहचविण्याचे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक अनिल शहारे यांनी किटकनाशक फवारणी करताना विशेष काळजी कशी घ्यायची याबाबद प्रात्यक्षिक दाखविले. कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके यांनी प्रगतशिल शेतकºयांना आश्वासीत करीत नियमित मार्गदर्शन देण्याचे मान्य करीत कृषीज्ञान तुमच्याकरिता समर्पीत असल्याचे सांगितले.संचालन कृषीसहाय्यक शिल्पा खंडाईत, श्रीकांत सपाटे तर आभार कृषीसहाय्यक विभा शिवणकर यांनी केले.