शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार क्षेत्रच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:42 IST

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, सहकारी संस्थांनी मालक व वनता विश्वस्त म्हणून कार्य करावे, ....

ठळक मुद्देशेखर चरेगावकर : सहकार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, सहकारी संस्थांनी मालक व वनता विश्वस्त म्हणून कार्य करावे, तरच सहकार चळवळीला गतवैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सहकारी भारती यांचे विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहकार परिषदेचे आयोजन भंडारा येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काका कोयटे, उपकार्याध्य सुदर्शन भालेराव, आयकर व जीएसटी व्याख्याता अभिजीत केळकर, सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे, प्रशांत खोब्रागडे, सहकार भारतीचे प्रदेश पतसंस्थेचे प्रकोष्ठ सहप्रमुख सोमेश्वर मते, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा पांढरीपांडे उपस्थित होते.यावेळी शेखर चरेगावकर म्हणाले, जीएसटीमुळे येणारा काळ हा सहकारी संस्थांना चांगले काम करण्यास उत्तम आहे. कोणत्याही प्राचारास बळी न पडता या कराराबाबत सहकार क्षेत्रातील सभासदांनी माहिती करून घ्यावी. तसे मेळावे घेवून प्रबोधन करावे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे करात होणारा बदल समजावून घ्या. त्यामुळे कराबाबत मनात असलेली भीती जाईल व कान्फीडेन्स वाढेल. यासाठी चिंतन करा व बदल स्वीकारा असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्थांनी याबाबत शैक्षणिक सहली आयोजित कराव्यात. त्यामुळे सहकार क्षेत्राचे सक्षमीकरण होईल, असेही ते म्हणाले.यावेळी अभिजीत केळकर यांनी जीएसटी कायद्याबाबत मार्गदर्शन केले. काका कोयटे यांनी राज्यातील सहकारी दिंडीमध्ये भंडारा जिल्ह्यातील सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळेच सहकार दिंडीचे यशस्वी नियोजन करता आले, ही भंडारावासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे सांगितले. प्रशांत खोब्रागडे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.प्रारंभी युवक बिरादरीच्या चमूच्यावतीने सहकार क्षेत्रावर आधारित नाट्य सादर केले. प्रास्ताविकात सहाय्यक निबंधक विलास देशपांडे यांनी सहकारी परिषद तसेच कर्जमाफीसंदर्भात माहिती विषद केली. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.